शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

युद्धाची भाषा करणा-या चीनला आता सुचले शहाणपण! शांततेत डोकलामचा विषय सुटला त्यातच समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 1:04 PM

डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देचीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता.

नवी दिल्ली - डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. डोकलामच्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीनच्या सरंक्षण आणि अन्य मंत्रालयांनी एकत्रित काम केले असे लियु फांग म्हणाल्या. त्या चिनी लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. डोकलाममध्ये जवळपास दहा आठवडे चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. 

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. चीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. खरतर डोकलामचा भूभाग भूतानच्या हद्दीत येतो. पण चीनने या भागावर हक्क सांगून रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने संघर्षाची स्थिती उदभवली. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे परवडणारे नसल्याने भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखले. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अन्य देशांच्या लष्करांबरोबर संवादाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचा फायदा होताना दिसतोय असे लियु म्हणाल्या. चीन आपल्या मित्रपरिवाराचा विस्तार करत असून, फक्त मोठे देशच नव्हते छोटया देशांबरोबरही मैत्रीसंबंध प्रस्थापित करतोय असे लियु म्हणाल्या. 

डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर होते. चीनकडून यावेळी बघून घेण्याची भाषा केली जात होती. ग्लोबल टाइम्स आणि अन्य चीन सरकारच्या मालकीच्या वृत्तपत्रांमधून धमक्या दिल्या जात होत्या. पण भारतीय लष्कराने जाहीरपणे कुठलीही अरेरावीची भाषा न करता संयमाने हा विषय हाताळला. चीन मधल्या एका वृत्तपत्राने तर युद्धाची डेडलाईन घोषित केली होती. पण भारताने आपल्या डिप्लोमसीने चीनवर दबाव वाढवला. अखेर युद्धाची भाषा करणा-या चीनला मागे हटावेच लागले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन