शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

युद्धाची भाषा करणा-या चीनला आता सुचले शहाणपण! शांततेत डोकलामचा विषय सुटला त्यातच समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 13:10 IST

डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देचीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता.

नवी दिल्ली - डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. डोकलामच्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीनच्या सरंक्षण आणि अन्य मंत्रालयांनी एकत्रित काम केले असे लियु फांग म्हणाल्या. त्या चिनी लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. डोकलाममध्ये जवळपास दहा आठवडे चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. 

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. चीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. खरतर डोकलामचा भूभाग भूतानच्या हद्दीत येतो. पण चीनने या भागावर हक्क सांगून रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने संघर्षाची स्थिती उदभवली. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे परवडणारे नसल्याने भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखले. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अन्य देशांच्या लष्करांबरोबर संवादाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचा फायदा होताना दिसतोय असे लियु म्हणाल्या. चीन आपल्या मित्रपरिवाराचा विस्तार करत असून, फक्त मोठे देशच नव्हते छोटया देशांबरोबरही मैत्रीसंबंध प्रस्थापित करतोय असे लियु म्हणाल्या. 

डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर होते. चीनकडून यावेळी बघून घेण्याची भाषा केली जात होती. ग्लोबल टाइम्स आणि अन्य चीन सरकारच्या मालकीच्या वृत्तपत्रांमधून धमक्या दिल्या जात होत्या. पण भारतीय लष्कराने जाहीरपणे कुठलीही अरेरावीची भाषा न करता संयमाने हा विषय हाताळला. चीन मधल्या एका वृत्तपत्राने तर युद्धाची डेडलाईन घोषित केली होती. पण भारताने आपल्या डिप्लोमसीने चीनवर दबाव वाढवला. अखेर युद्धाची भाषा करणा-या चीनला मागे हटावेच लागले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन