शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

युद्धाची भाषा करणा-या चीनला आता सुचले शहाणपण! शांततेत डोकलामचा विषय सुटला त्यातच समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 13:10 IST

डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देचीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता.

नवी दिल्ली - डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. डोकलामच्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीनच्या सरंक्षण आणि अन्य मंत्रालयांनी एकत्रित काम केले असे लियु फांग म्हणाल्या. त्या चिनी लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. डोकलाममध्ये जवळपास दहा आठवडे चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. 

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. चीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. खरतर डोकलामचा भूभाग भूतानच्या हद्दीत येतो. पण चीनने या भागावर हक्क सांगून रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने संघर्षाची स्थिती उदभवली. चीनच्या  डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे परवडणारे नसल्याने भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखले. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अन्य देशांच्या लष्करांबरोबर संवादाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचा फायदा होताना दिसतोय असे लियु म्हणाल्या. चीन आपल्या मित्रपरिवाराचा विस्तार करत असून, फक्त मोठे देशच नव्हते छोटया देशांबरोबरही मैत्रीसंबंध प्रस्थापित करतोय असे लियु म्हणाल्या. 

डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर होते. चीनकडून यावेळी बघून घेण्याची भाषा केली जात होती. ग्लोबल टाइम्स आणि अन्य चीन सरकारच्या मालकीच्या वृत्तपत्रांमधून धमक्या दिल्या जात होत्या. पण भारतीय लष्कराने जाहीरपणे कुठलीही अरेरावीची भाषा न करता संयमाने हा विषय हाताळला. चीन मधल्या एका वृत्तपत्राने तर युद्धाची डेडलाईन घोषित केली होती. पण भारताने आपल्या डिप्लोमसीने चीनवर दबाव वाढवला. अखेर युद्धाची भाषा करणा-या चीनला मागे हटावेच लागले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन