शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना आता लसीकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला. हा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला. (Now the center-state clash over vaccination)केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला. आता लसीकरणाबाबतही तेच घडत आहे असा आरोप जावडेकर यांनी केला.महाराष्ट्राला १८ मार्च पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२ लाख ७४ हजार डोस मिळणार आहेत. लसीचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचे राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

१० दिवस पुरेल एवढाच साठाराज्य शासनाला केंद्राकडून मिळत असलेल्या कोरोना लसींचा पुरेपूर वापर केला जात आहे. दररोज तीन लाख लसी देण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी आठवड्याला २० लाख लसींचा पुरवठा करावा. १ कोटी ९७ लाख लोकांचे लसीकरण तीन महिन्यांत करायचे आहे. तीन लाखाच्या दररोजच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार फक्त दहा दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे.  - राजेश टोपे, आरोग्यमंत्री 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेPrakash Javadekarप्रकाश जावडेकर