शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:22 IST

निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत.

नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या भाजपच्या सर्व खासदारांनीखासदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता सुत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा आवास समितीने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सर्व खासदारांना ३० दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

आठ खासदार सामान्य पूलचा भाग आहेत. तीन खासदार मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना नगरविकास मंत्रालयाकडून बंगल्याचे वाटप केले जाते. सूत्रांचे म्हणणे आहे की, नियम सर्वांसाठी समान आहेत, केवळ विरोधी खासदारांसाठीच नाही. ज्या लोकसभा खासदारांना ३० दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये राकेश सिंह, अरुण साव, गोमती साय, रिती पाठक, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि उदय प्रताप सिंग या नावांचा समावेश आहे.

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना उभे केले होते, त्यापैकी १२ खासदार विधानसभा निवडणुका जिंकण्यात यशस्वी ठरले होते. निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. तर छत्तीसगडमधून अरुण साव, रेणुका सिंह, गोमती साई आहेत. तसेच, मध्य प्रदेशामधून नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप आणि रिती पाठक यांचा समावेश आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये टाईप ६ पासून टाइप ८ पर्यंतचे सरकारी बंगले खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दिले जातात. कोणत्या खासदाराला कोणत्या प्रकारचा बंगला मिळणार हे त्याच्या ज्येष्ठतेवर अवलंबून असते. खासदारांनी राजीनामा दिल्यास त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हे बंगले रिकामे करावे लागतील. मात्र, ३० दिवसांच्या नोटीसनंतरही संबंधित खासदार त्या बंगल्यात काही काळ राहू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना बाजारभावानुसार भाडे द्यावे लागते.

टॅग्स :ParliamentसंसदMember of parliamentखासदारRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३