शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

दोनशेहून अधिक पतसंस्थांना नोटीसा राज्य पतसंस्था फेडरेशन : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

अहमदनगर : जिल्‘ातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना आयकर खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीमध्ये संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. यामुळे जिल्‘ातील पतसंस्था चालक आणि सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. या विरोधात राज्य सहकारी पतसंस्था यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा स्थैर्यनिधी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत शनिवारी ही माहिती देण्यात आली.

अहमदनगर : जिल्ह्यातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना आयकर खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीमध्ये संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. यामुळे जिल्ह्यातील पतसंस्था चालक आणि सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. या विरोधात राज्य सहकारी पतसंस्था यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा स्थैर्यनिधी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत शनिवारी ही माहिती देण्यात आली.
आयकर खात्याने जिल्ह्यातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना नोटीसा पाठवून मागील तीन वर्षात संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. या सभासदांकडून आयकर खाते कर वसूल करण्याचा प्रयत्न करत असून यामुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत खळबळ उडाली आहे. या विरोधात जनजागृती करण्यासाठी शनिवारी जिल्हा बँकेच्या विखे पाटील सभागृहात कार्यशाळा पार पडली.
आयकर सल्लागार आनंद साबद्रा यांनी उपस्थित संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. यावेळी काका कोयटे, सुरेश वाबळे, सबाजी गायकवाड, वसंत लोढा, काकासाहेब बोरावके, अशोक कटारिया, विठ्ठलराव चास्कर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना साबद्रा यांनी स्पष्ट केले की, पतसंस्थांना आयकर लागू आहे. आयकर कायदा मोडल्यास त्यांना दंडाला समोरे जावे लागेल. या कायद्यात ३०० कलमे असून जगात हजारो कायदे असतांना हा एकमेव कायदा असा आहे, की तो दरवर्षी बदलत असतो.
या कायद्यातील कलम १३२ हे धाड आणि कलम १३३ हे चौकशीचे आहेत. हे सर्वांत घातक कलम असून ते मागे लागल्यास यातून सुटका नसल्याचे स्पष्ट केले. २०१३ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र गुंतवणूक कायदा लागू झाला. यात संस्थेच्या कर्मचारी अथवा संचालकांनी चुकीचा व्यवहार केल्यास त्याला अटकेला समोरे जावे लागते. आयकर खात्याने जिल्ह्यातील संस्थांना त्यांच्या अधिकारात माहिती मागविली असून ती माहिती त्यांना देणे बंधनकारक आहे. यामुळे ज्या संस्थांना ही नोटीस आलेली आहे, त्यांना माहिती सादर करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीने या नोटीसांना आपत्ती न समजता इष्टापत्ती समजावे. यात संस्थेकडून राहिलेल्या त्रुटी आणि चुका सुधारणा करण्याची संधी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
...............अपूर्ण...........