शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

दोनशेहून अधिक पतसंस्थांना नोटीसा राज्य पतसंस्था फेडरेशन : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

अहमदनगर : जिल्‘ातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना आयकर खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीमध्ये संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. यामुळे जिल्‘ातील पतसंस्था चालक आणि सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. या विरोधात राज्य सहकारी पतसंस्था यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा स्थैर्यनिधी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत शनिवारी ही माहिती देण्यात आली.

अहमदनगर : जिल्ह्यातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना आयकर खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीमध्ये संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. यामुळे जिल्ह्यातील पतसंस्था चालक आणि सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. या विरोधात राज्य सहकारी पतसंस्था यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा स्थैर्यनिधी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत शनिवारी ही माहिती देण्यात आली.
आयकर खात्याने जिल्ह्यातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना नोटीसा पाठवून मागील तीन वर्षात संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्‍या सभासदांची माहिती मागविली आहे. या सभासदांकडून आयकर खाते कर वसूल करण्याचा प्रयत्न करत असून यामुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत खळबळ उडाली आहे. या विरोधात जनजागृती करण्यासाठी शनिवारी जिल्हा बँकेच्या विखे पाटील सभागृहात कार्यशाळा पार पडली.
आयकर सल्लागार आनंद साबद्रा यांनी उपस्थित संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. यावेळी काका कोयटे, सुरेश वाबळे, सबाजी गायकवाड, वसंत लोढा, काकासाहेब बोरावके, अशोक कटारिया, विठ्ठलराव चास्कर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना साबद्रा यांनी स्पष्ट केले की, पतसंस्थांना आयकर लागू आहे. आयकर कायदा मोडल्यास त्यांना दंडाला समोरे जावे लागेल. या कायद्यात ३०० कलमे असून जगात हजारो कायदे असतांना हा एकमेव कायदा असा आहे, की तो दरवर्षी बदलत असतो.
या कायद्यातील कलम १३२ हे धाड आणि कलम १३३ हे चौकशीचे आहेत. हे सर्वांत घातक कलम असून ते मागे लागल्यास यातून सुटका नसल्याचे स्पष्ट केले. २०१३ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र गुंतवणूक कायदा लागू झाला. यात संस्थेच्या कर्मचारी अथवा संचालकांनी चुकीचा व्यवहार केल्यास त्याला अटकेला समोरे जावे लागते. आयकर खात्याने जिल्ह्यातील संस्थांना त्यांच्या अधिकारात माहिती मागविली असून ती माहिती त्यांना देणे बंधनकारक आहे. यामुळे ज्या संस्थांना ही नोटीस आलेली आहे, त्यांना माहिती सादर करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीने या नोटीसांना आपत्ती न समजता इष्टापत्ती समजावे. यात संस्थेकडून राहिलेल्या त्रुटी आणि चुका सुधारणा करण्याची संधी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
...............अपूर्ण...........