शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भगवान शिव हाजीर हो! देवाला न्यायालयाचे समन्स; ​​​​​​​गैरहजर राहिल्यास १०,००० दंडाची तंबी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:19 IST

हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशारा

- खुशालचंद बाहेतीरायपूर : छत्तीसगडच्या रायगड येथील तहसीलदार न्यायालयाने एका विचित्र आदेशात, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाच्या सुनावणीत भगवान शिव यांच्यासह १० जणांना समक्ष हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सुधा राजवाडे यांनी १६ जणांविरुद्ध सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती.  रायगड शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधील कोहकुंडा परिसरातील शिवमंदिरही यात आहे.  हायकोर्टाने राज्य सरकार आणि तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.प्राथमिक तपास आणि पाहणीतून १० जणांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यात  शिवमंदिराचाही समावेश आहे. या १० जणांना तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी कोर्टाने नोटीस बजावली आहे.तहसीलदारांच्या नोटिशीत  शिवमंदिराचे नाव  क्रमांक ६ वर आहे. नोटीस मंदिराच्या विश्वस्त, व्यवस्थापक किंवा पुजारी यांना दिलेली  नसून थेट भगवान शंकराला पाठविण्यात आली आहे. तहसीलदार कोर्टाच्या  नोटीसमध्ये भगवान शिव यांना तुमचे कृत्य छत्तीसगड जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत येते. याचा जाब देण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहावे. न राहिल्यास १० हजार रुपयांचा  दंड तसेच ताब्यात असलेल्या जमिनीतून निष्कासनास सामोरे जावे लागू शकते, असे नमूद केले आहे. देवाने जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असेही निर्देश दिले आहेत.तहसीलदार विक्रांतसिंह ठाकूर यांनी ही नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.  सरकारी मालमत्तेवरील अतिक्रमणाचा हा खटला आहे.पहिल्यांदाच नाहीयापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये, छत्तीसगड पाटबंधारे विभाग (चंपा जिल्हा) उपविभागीय अधिकारी जंजगीर-शाखा कालवा उपविभाग क्र. १ यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता रिकामी करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी विनंती देवाला केली होती. नोटीसमध्ये कोणत्याही ट्रस्ट किंवा समितीचा उल्लेख नव्हता. पटवारी हलका क्रमांक १० जंजगीर शाखा कालव्यातील १९८८ चौरस फूट जागेवर आपण अतिक्रमण केले असून सरकारी जमीन ताब्यात घेणे हा गुन्हा आहे, असेही भगवान भोलेनाथ यांना लिहिले होते.