शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:18 IST

या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘देशाच्या विकासाची गती वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकत्र काम केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. या बैठकीला राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 

‘२०४७ मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्ये’ हा नीती आयोगाची सर्वोच्च संस्था असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचा विषय होता. ‘विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे. प्रत्येक राज्य विकसित असेल, तेव्हा भारत विकसित असेल. ही भारतातील १४० कोटी नागरिकांची आकांक्षा आहे’, असे पंतप्रधान या बैठकीत म्हणाले. या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. पंतप्रधान म्हणाले, ‘प्रत्येक राज्य विकसित करणे, प्रत्येक शहर विकसित करणे, प्रत्येक नगरपालिका विकसित करणे आणि प्रत्येक गाव विकसित करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. पंतप्रधानांनी असेही सुचवले की, राज्यांनी जागतिक मानकांनुसार आणि सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा पुरवून प्रत्येक राज्यात किमान एक पर्यटनस्थळ विकसित करावे. 

काँग्रेसचा हल्लाबोल

निती आयोगाला ‘अयोग्य संस्था’ असे म्हणत, काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा सामाजिक सौहार्द नष्ट होईल,  आर्थिक विषमता निर्माण होईल, विविधता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा कोणता ‘विकसित भारत’ असेल, असा सवाल काँग्रेसने केला. बैठकीपूर्वी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर सरकारवर टीका करताना म्हटले की, सत्तेत लोकच जर द्वेषयुक्त शब्द व कृतींनी सामाजिक सौहार्दाचे बंधन स्वतःच नष्ट करतील तर तो कोणत्या प्रकारचा विकसित भारत असेल? जगाच्या नजरेत भारत ज्या मूल्यांसाठी नेहमीच उभा राहिला आहे. 

राज्यांचे तीन उपसमूह तयार करा चंद्राबाब नायडू 

२०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करण्यासाठी राज्य सरकारांचे तीन उपसमूह तयार करण्याचा प्रस्ताव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिला. नायडू यांनी केंद्र सरकार व नीती आयोगाच्या सहकार्याने राज्यांचे तीन उप-गट तयार करण्याचा प्रस्ताव दिला. जीडीपी वाढीवरील पहिल्या उप-गटाचे उद्दिष्ट गुंतवणूक, उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीला चालना देणे असेल, याला केंद्रीय व्यवहार्यता निधीतून पाठिंबा दिला जाईल.

आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी

निती आयोगाच्या बैठकीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित पुद्दुचेरी, कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेकडील तीन राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीत ३६ पैकी ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भाग घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्यातील ‘पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये’ व्यग्र असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.  त्यांनी त्यांचे भाषण परिषदेत वाचण्यासाठी पाठवले. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयनदेखील उपस्थित राहिले नाहीत. विजयन यांनी त्यांच्या जागी अर्थमंत्री बालगोपाल यांना बैठकीसाठी पाठवले आहे. मात्र, ही मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने, बालगोपाल त्यात सहभागी होऊ शकतील की नाही हे स्पष्ट नाही.

आधीच्या आप सरकारचे दिल्लीच्या हितांकडे दुर्लक्ष

दिल्लीतील आधीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीच्या हिताचे मुद्दे बऱ्याच काळापासून नीती आयोगासमोर उपस्थित केले नाहीत, असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी  बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी केला. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये गुप्ता म्हणाल्या की, मागील बेजबाबदार सरकारांच्या वर्तनामुळे बैठकीत दिल्लीचे हक्क उपस्थित केले जात नव्हते; परंतु आता  त्या ‘विकसित दिल्ली फॉर डेव्हलप्ड इंडिया’चा रोडमॅप सादर करणार आहेत. 

 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदी