शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

Note Ban : काळा पैसा पांढरा करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी सुचवला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:45 IST

Note Ban : नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे.

हैदराबाद - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोटाबंदी निर्णयाच्या घोषणेनंतर जवळपास दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या नोटांचा आकडा जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बाद झालेल्या नोटांपैकी केवळ  99.30 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. या अहवालावरुन भाजपा सरकारवर सर्व स्तरातून हल्लाबोल चढवण्यात आहे. एकीकडे भाजपावर टीकास्त्र सोडण्यात येत असताना भाजपा नेते मात्र नोटाबंदी निर्णयाचं जोरदार समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे. बाद झालेल्या जवळपास सर्व नोटा बँकेमध्ये जमा झाल्या आहेत. नोटाबंदी निर्णयावरील रिझर्व्ह बँकेच्या अहवालावर लोकांना आक्षेप का आहे, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  

(नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी)

'जो पैसा बाथरुम आणि बिछान्याखाली लपवून ठेवण्यात येत होता. तोच पैसा बँकेत जमा झाला. बँकेत जमा झालेल्या रोकडमध्ये कितीप्रमाणात काळा पैसा होता आणि किती पांढरा पैसा होता, हे पाहणं रिझर्व्ह बँक आणि आयकर विभागाची जबाबदारी असून याची पडताळणी ते करतील', अशी प्रतिक्रिया नायडू यांनी दिली आहे.  

नायडू पुढे असंही म्हणाले की, ज्या लोकांना काळा पैसा पांढरा करण्याची इच्छा अाहे त्यांच्यासाठीही संसदेने उपाय शोधला आहे. योग्य वेळेत कर भरावा आणि त्यात महसूल समाविष्ट करावा, जेणेकरुन लोकांच्या भल्यासाठी याचा वापर केला जाईल.

अमित शहा नोटाबंदीचे लाभार्थी - राहुल गांधी

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरबीआयच्या अहवालावरुन भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. काही बड्या उद्योगपतींकडे असलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदीचा उपयोग करण्यात आला. अमित शहा हेही त्याचे लाभार्थी आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. 

मोदी यांना जे उद्योगपती मदत करतात, त्यांचा फायदा पंतप्रधान या पद्धतीनं करुन देतात, असे आता उघडच झाले आहे. नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचा दावा करताना ते म्हणाले की, यामुळे लोकांचा रोजगार गेला. अनेक लहान उद्योग बंद पडले. देशाचा जीडीपी 2 टक्क्यांनी घटला आणि नोटाबंदीनंतर पैशांसाठी बँकांबाहेर उभे राहिलेल्यांपैकी 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, हे सर्वांनीच पाहिले आहे.  

या नोटाबंदीमुळे काळा पैसा परत आला का, दहशतवाद्यांच्या कारवाया थांबल्या का, बनावट नोटांची छपाई बंद झाली का, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेत.

 

टॅग्स :Note BanनोटाबंदीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी