शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Note Ban : काळा पैसा पांढरा करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी सुचवला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:45 IST

Note Ban : नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे.

हैदराबाद - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोटाबंदी निर्णयाच्या घोषणेनंतर जवळपास दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या नोटांचा आकडा जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बाद झालेल्या नोटांपैकी केवळ  99.30 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. या अहवालावरुन भाजपा सरकारवर सर्व स्तरातून हल्लाबोल चढवण्यात आहे. एकीकडे भाजपावर टीकास्त्र सोडण्यात येत असताना भाजपा नेते मात्र नोटाबंदी निर्णयाचं जोरदार समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे. बाद झालेल्या जवळपास सर्व नोटा बँकेमध्ये जमा झाल्या आहेत. नोटाबंदी निर्णयावरील रिझर्व्ह बँकेच्या अहवालावर लोकांना आक्षेप का आहे, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  

(नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी)

'जो पैसा बाथरुम आणि बिछान्याखाली लपवून ठेवण्यात येत होता. तोच पैसा बँकेत जमा झाला. बँकेत जमा झालेल्या रोकडमध्ये कितीप्रमाणात काळा पैसा होता आणि किती पांढरा पैसा होता, हे पाहणं रिझर्व्ह बँक आणि आयकर विभागाची जबाबदारी असून याची पडताळणी ते करतील', अशी प्रतिक्रिया नायडू यांनी दिली आहे.  

नायडू पुढे असंही म्हणाले की, ज्या लोकांना काळा पैसा पांढरा करण्याची इच्छा अाहे त्यांच्यासाठीही संसदेने उपाय शोधला आहे. योग्य वेळेत कर भरावा आणि त्यात महसूल समाविष्ट करावा, जेणेकरुन लोकांच्या भल्यासाठी याचा वापर केला जाईल.

अमित शहा नोटाबंदीचे लाभार्थी - राहुल गांधी

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरबीआयच्या अहवालावरुन भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. काही बड्या उद्योगपतींकडे असलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदीचा उपयोग करण्यात आला. अमित शहा हेही त्याचे लाभार्थी आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. 

मोदी यांना जे उद्योगपती मदत करतात, त्यांचा फायदा पंतप्रधान या पद्धतीनं करुन देतात, असे आता उघडच झाले आहे. नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचा दावा करताना ते म्हणाले की, यामुळे लोकांचा रोजगार गेला. अनेक लहान उद्योग बंद पडले. देशाचा जीडीपी 2 टक्क्यांनी घटला आणि नोटाबंदीनंतर पैशांसाठी बँकांबाहेर उभे राहिलेल्यांपैकी 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, हे सर्वांनीच पाहिले आहे.  

या नोटाबंदीमुळे काळा पैसा परत आला का, दहशतवाद्यांच्या कारवाया थांबल्या का, बनावट नोटांची छपाई बंद झाली का, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेत.

 

टॅग्स :Note BanनोटाबंदीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी