शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 00:53 IST

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.रिझर्व्ह बँकेच्या कामाचे कौतुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालाचा हवाला जेटली यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिला. अलीकडील काही वर्षांत रिझर्व्ह बँकेच्या निगराणी आणि नियमनात सुधारणा झाली आहे, असे प्रशंसोद्गार या अहवालात नाणेनिधीने काढले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कामावर सरकार नाखूश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर लोकसभाध्यक्षांना उद्देशून जेटली यांनी ‘नो मॅडम’ असे उत्तर दिले. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. रिझर्व्ह बँकेकडे राखीव निधी किती असावा, हा वादाचा मुख्य मुद्दा होता. त्याचप्रमाणे लघु व मध्यम उद्योगांना द्यावयाच्या कर्जाविषयीचे नियम आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरील कारवाईची कृती यावरूनही सरकार आणि पटेल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक