शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशात भारतीय जमा करतायत स्वतःचा काळा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:22 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केलं आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, याचा खुलासा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स(बीआयएस)च्या रिपोर्टमधून झाला आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केलं आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, याचा खुलासा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स(बीआयएस)च्या रिपोर्टमधून झाला आहे.परदेशात जमा असलेल्या भारतीयांच्या काळा पैशाची ही रक्कम 2015मधल्या देशातील जीडीपीच्या जवळपास 3 टक्के एवढी आहे. तसेच 2007पासून 2015पर्यंत परराष्ट्रात जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आता भारतीय स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत आहेत. हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या आशियाई देशातील बँकांत भारतीयांनी जवळपास 53 टक्के हिस्सा जमा केला आहे. स्विस बँकेत 2015मध्ये फक्त 31 टक्के काळा पैसा जमा होता. केंद्र सरकारनं मध्यंतरीच्या काळात स्विस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठीही मोहीम उघडली आहे. मात्र या भारतीयांच्या काळ्या पैशाचा मोठा हिस्सा आशियाई टॅक्स हेवनमध्ये दडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातून स्वित्झर्लंड बँकेवर दबाव वाढत आहे. दबावाखातरच स्विस बँकेनं पैसे जमा करण्याच्या नियमांत पारदर्शीपणा आणला आहे. त्यामुळे लोकांनी आता आशियाई बँकेत पैसे जमा करण्याला प्राधान्य दिलं आहे. भारतासह अन्य देशांतील लोक काळा पैसा लपवण्यासाठी स्विस  बँकेऐवजी आशियाई टॅक्स हेवन बँकांना प्राथमिकता देत असल्याचंही पनामा पेपर्स प्रकरणातून बाहेर आलं आहे. जर सरकारनं काळा पैसा भारतात आणण्यासाठी गंभीर असेल, तर त्यांनी स्विस बँकेसह आशियाई टॅक्स हेवन्स बँकांवरही लक्ष्य केंद्रित करावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा ब्रिटनस्थित एका संस्थेनं भारतातल्या काळा पैशासंदर्भात खुलासा केला होता. 2005 ते 2014 या काळात भारतात तब्बल 770 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले, असे ब्रिटनमधील एक संस्था ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी’ने (जीएफआय) म्हटले आहे.याच काळात 165 अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले. एकट्या 2014 मध्ये 101 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. याच वर्षात 23 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले. 2014 मध्ये अर्थव्यवस्थेत विकसित होणारा बेकायदेशीर वित्तीय प्रवाह (आयएफएफ) तब्बल 1 निखर्व डॉलर होता. या आकड्याची सामान्यांना कल्पनाही करवणार नाही, इतका तो मोठा आहे. जीएफआयने ‘विकसनशील देशांतील बेकायदेशीर वित्तीय प्रवाह : 2005-2014 या नावाने  हा अहवाल दिला आहे. काळ्या पैशावर जारी झालेला हा पहिला जागतिक पातळीवरील अहवाल आहे. त्यात देशात येणारा आणि देशातून बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या काळ्या पैशाची नोंद करण्यात आली आहे.