शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशात भारतीय जमा करतायत स्वतःचा काळा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:22 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केलं आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, याचा खुलासा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स(बीआयएस)च्या रिपोर्टमधून झाला आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केलं आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, याचा खुलासा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स(बीआयएस)च्या रिपोर्टमधून झाला आहे.परदेशात जमा असलेल्या भारतीयांच्या काळा पैशाची ही रक्कम 2015मधल्या देशातील जीडीपीच्या जवळपास 3 टक्के एवढी आहे. तसेच 2007पासून 2015पर्यंत परराष्ट्रात जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आता भारतीय स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत आहेत. हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या आशियाई देशातील बँकांत भारतीयांनी जवळपास 53 टक्के हिस्सा जमा केला आहे. स्विस बँकेत 2015मध्ये फक्त 31 टक्के काळा पैसा जमा होता. केंद्र सरकारनं मध्यंतरीच्या काळात स्विस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठीही मोहीम उघडली आहे. मात्र या भारतीयांच्या काळ्या पैशाचा मोठा हिस्सा आशियाई टॅक्स हेवनमध्ये दडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातून स्वित्झर्लंड बँकेवर दबाव वाढत आहे. दबावाखातरच स्विस बँकेनं पैसे जमा करण्याच्या नियमांत पारदर्शीपणा आणला आहे. त्यामुळे लोकांनी आता आशियाई बँकेत पैसे जमा करण्याला प्राधान्य दिलं आहे. भारतासह अन्य देशांतील लोक काळा पैसा लपवण्यासाठी स्विस  बँकेऐवजी आशियाई टॅक्स हेवन बँकांना प्राथमिकता देत असल्याचंही पनामा पेपर्स प्रकरणातून बाहेर आलं आहे. जर सरकारनं काळा पैसा भारतात आणण्यासाठी गंभीर असेल, तर त्यांनी स्विस बँकेसह आशियाई टॅक्स हेवन्स बँकांवरही लक्ष्य केंद्रित करावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा ब्रिटनस्थित एका संस्थेनं भारतातल्या काळा पैशासंदर्भात खुलासा केला होता. 2005 ते 2014 या काळात भारतात तब्बल 770 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले, असे ब्रिटनमधील एक संस्था ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी’ने (जीएफआय) म्हटले आहे.याच काळात 165 अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले. एकट्या 2014 मध्ये 101 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. याच वर्षात 23 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले. 2014 मध्ये अर्थव्यवस्थेत विकसित होणारा बेकायदेशीर वित्तीय प्रवाह (आयएफएफ) तब्बल 1 निखर्व डॉलर होता. या आकड्याची सामान्यांना कल्पनाही करवणार नाही, इतका तो मोठा आहे. जीएफआयने ‘विकसनशील देशांतील बेकायदेशीर वित्तीय प्रवाह : 2005-2014 या नावाने  हा अहवाल दिला आहे. काळ्या पैशावर जारी झालेला हा पहिला जागतिक पातळीवरील अहवाल आहे. त्यात देशात येणारा आणि देशातून बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या काळ्या पैशाची नोंद करण्यात आली आहे.