शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 19:41 IST

इस्रोने विविध मोहिमांवर फक्त पैसे खर्च केला नाही, तर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊन परतफेड केली आहे.

ISRO : देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताला अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला. त्याकाळी अविकसित देश असलेल्या भारतातील लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नव्हते, अशा काळात अंतराळ क्षेत्रात पुढे जाणे खूप अवघड गोष्ट होती. पण, ISRO ने एक-एक पाऊले टाकत आपला प्रवास सुरू केला आणि आज इस्रो जगभरातील टॉपच्या अंतराळ संस्थांमध्ये सामील आहे. 

आज जेव्हा आपण इस्रोच्या कामगिरीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की, भारताने एक देश म्हणून किती प्रगती केली आहे. इस्रोने आतापर्यंत चांद्रयान, मंगळयान, सूर्ययान..यांसारखी अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमा पार पाडण्यासाठी इस्रोने फक्त पैसे खर्च केला नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 5 ट्रिलियन रुपयांचे योगदानही दिले आहे.

1 रुपये खर्च करून 2.5 रुपये कमावलेनुकताच इस्रोच्या योगदानाबाबत 'सामाजिक आर्थिक प्रभाव विश्लेषण' आयोजित करण्यात आला होता. त्याचा अहवाल समोर आल्यावर इस्रोशी संबंधित अनेक अनोखे तथ्य समोर आले आहेत. इस्रोवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, संस्थेने आपल्या मोहिमांवर आणि संशोधनावर जेवढा खर्च केला, त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, ISRO ने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी 2.5 रुपये परतावा दिला आहे.

सोमनाथ म्हणतात, “चंद्रावर जाणे खूप खर्चीक काम आहे. यासाठी आम्ही केवळ सरकारच्या निधीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे स्पेस सेक्टरच्या व्यवसायात आपल्याला स्थान निर्माण करावे लागेल, जेणेकरून आपण या क्षेत्रात टिकून राहू."

जीडीपीला 5 ट्रिलियन दिलेइस्रोचा 'सामाजिक-आर्थिक प्रभाव विश्लेषण' अहवाल नुकताच केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल दर्शवितो की, भारताच्या अंतराळ उद्योगाने 2014 ते 2024 दरम्यान GDP मध्ये $60 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी किंवा रु. 5 ट्रिलियन) योगदान दिले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अंतराळ क्षेत्रामुळे $1 चा गुणक प्रभाव $2.54 होता.

गुणक प्रभावाची गणना विशेषतः पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केली जाते. यामध्ये सरकार किती खर्च करत आहे आणि याचा अर्थव्यवस्थेला वेगवेगळ्या प्रकारे किती फायदा होत आहे, हे पाहते. उदाहरणार्थ, सरकारने रस्ता बांधला, तर किती लोकांना रोजगार मिळाला, मालमत्तेचे मूल्य किती वाढले, इंधनाची अर्थव्यवस्था किती सुधारली आणि किती लोकांचे जीवन बदलले, अशा अनेक घटकांची गणना केली जाते. हे त्याचे एकूण गुणक प्रभाव दर्शवते.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था