शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 19:41 IST

इस्रोने विविध मोहिमांवर फक्त पैसे खर्च केला नाही, तर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊन परतफेड केली आहे.

ISRO : देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताला अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला. त्याकाळी अविकसित देश असलेल्या भारतातील लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नव्हते, अशा काळात अंतराळ क्षेत्रात पुढे जाणे खूप अवघड गोष्ट होती. पण, ISRO ने एक-एक पाऊले टाकत आपला प्रवास सुरू केला आणि आज इस्रो जगभरातील टॉपच्या अंतराळ संस्थांमध्ये सामील आहे. 

आज जेव्हा आपण इस्रोच्या कामगिरीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की, भारताने एक देश म्हणून किती प्रगती केली आहे. इस्रोने आतापर्यंत चांद्रयान, मंगळयान, सूर्ययान..यांसारखी अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमा पार पाडण्यासाठी इस्रोने फक्त पैसे खर्च केला नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 5 ट्रिलियन रुपयांचे योगदानही दिले आहे.

1 रुपये खर्च करून 2.5 रुपये कमावलेनुकताच इस्रोच्या योगदानाबाबत 'सामाजिक आर्थिक प्रभाव विश्लेषण' आयोजित करण्यात आला होता. त्याचा अहवाल समोर आल्यावर इस्रोशी संबंधित अनेक अनोखे तथ्य समोर आले आहेत. इस्रोवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, संस्थेने आपल्या मोहिमांवर आणि संशोधनावर जेवढा खर्च केला, त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, ISRO ने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी 2.5 रुपये परतावा दिला आहे.

सोमनाथ म्हणतात, “चंद्रावर जाणे खूप खर्चीक काम आहे. यासाठी आम्ही केवळ सरकारच्या निधीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे स्पेस सेक्टरच्या व्यवसायात आपल्याला स्थान निर्माण करावे लागेल, जेणेकरून आपण या क्षेत्रात टिकून राहू."

जीडीपीला 5 ट्रिलियन दिलेइस्रोचा 'सामाजिक-आर्थिक प्रभाव विश्लेषण' अहवाल नुकताच केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल दर्शवितो की, भारताच्या अंतराळ उद्योगाने 2014 ते 2024 दरम्यान GDP मध्ये $60 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी किंवा रु. 5 ट्रिलियन) योगदान दिले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अंतराळ क्षेत्रामुळे $1 चा गुणक प्रभाव $2.54 होता.

गुणक प्रभावाची गणना विशेषतः पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केली जाते. यामध्ये सरकार किती खर्च करत आहे आणि याचा अर्थव्यवस्थेला वेगवेगळ्या प्रकारे किती फायदा होत आहे, हे पाहते. उदाहरणार्थ, सरकारने रस्ता बांधला, तर किती लोकांना रोजगार मिळाला, मालमत्तेचे मूल्य किती वाढले, इंधनाची अर्थव्यवस्था किती सुधारली आणि किती लोकांचे जीवन बदलले, अशा अनेक घटकांची गणना केली जाते. हे त्याचे एकूण गुणक प्रभाव दर्शवते.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था