शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:59 IST

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत ...

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांतील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर भारतातही या विषाणूचे नवे उपप्रकार झपाट्याने पसरत आहेत. JN.1, NB.1.8.1, LF.7 आणि XFG हे ओमिक्रॉनचे उपप्रकार असून, त्यांचा संसर्ग वेगाने होत आहे. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांकमहाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण नोंदवले जात असून, गुरुवारी राज्यात ७६ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. राज्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ५९७ रुग्ण आढळले असून, सध्या ४२५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६५ रुग्ण बरे झाले असून, सात मृत्यू झाले आहेत. मृत्यू पावलेल्यांपैकी सहा जणांना इतर गंभीर आजार होते.

मुंबईत २७, पुण्यात २१, ठाणे महानगरपालिकेत १२, कल्याणमध्ये ८, नवी मुंबईत ४, कोल्हापूर आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी १ तर रायगड जिल्ह्यात २ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतच एकूण ३७९ रुग्ण नोंदले गेले आहेत.

राजस्थानातही संसर्गाची झपाट्याने वाढराजस्थानमध्ये गुरुवारी १५ नवे रुग्ण सापडले. त्यापैकी ९ रुग्ण जयपूरमध्ये आढळले. उर्वरित प्रकरणे जोधपूर (२) आणि उदयपूर (४) येथे नोंदवली गेली. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) तपासलेल्या नमुन्यांमधून XFG आणि LF.7.9 प्रकारांची उपस्थिती निष्पन्न झाली आहे. हे प्रकार सध्या प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतात आढळून येत आहेत.

कर्नाटक आणि चंदीगडमध्ये मृत्यूंची नोंदकर्नाटकातील एका ७० वर्षीय व्यक्तीचा एन्सेफॅलोपॅथी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला, तर चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरातील स्थितीसध्या भारतात १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत आणि एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

लक्षणे आणि खबरदारीआरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की रुग्णांमध्ये घसा खवखवणे, ताप, अतिसार, सौम्य पोटदुखी, थकवा आणि आवाजातील बदल अशी लक्षणे दिसून येत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR यांनी राज्यांना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि उच्च जोखमीच्या गटासाठी बूस्टर डोस देणे यावर भर दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य