शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपा आणि काँग्रेसचा नव्हे, मी तर तेलंगणाचा एजंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:27 IST

जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे. विकासालाच माझे प्राधान्य आहे, असे टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केसीआर हे भाजपचे एजंट असल्याचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर हे काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप केला होता.त्या आरोपांना उत्तर देताना चंद्रशेखर राव यांनी भाजप व काँग्रेसचा समाचार घेतला. सूर्यापेठमधील कोडद येथे प्रचारादरम्यान ते बोलत होते. आम्ही केवळ तेलंगणाच्या विकासाचा विचार करतो. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना आम्ही २४ तास मोफत वीज देतो. भाजपाची जर १९ राज्यांमध्ये सत्ता आहे, तर त्यांना असे का जमत नाही? केवळ वल्गना करण्यात आणि फुशारकी मारण्यात तरबेज असलेल्या भाजपा नेत्यांकडून कोणतीच अपेक्षा करता येत नाही. ते शेतकरी विरोधी आहेत, अशी टीका त्यांनी केली.हीच अवस्था काँग्रेसचीही आहे. त्यामुळे तेलंगणातील जनता विकासालाच साथ देईल, आणि त्याचे प्रतिबिंब ११ डिसेंबरला सगळ््यांनाच दिसेल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला. भाजपाकडे पुन्हा मतदारांपर्यंत जाण्यासाठी कोणताच विकासाचा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर जाण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा राजकीय पटलावर आणला जात आहे, असे केसीआर म्हणाले. तर टीआरएसचे दुसरे नेते राम प्रसाद यांनीही योगी सरकारवर टीकास्र सोडले. उत्तर प्रदेशातील जनता भाजपवर प्रचंड नाराज असून, यांना सत्तेवर बसवून आम्ही चूक केली, अशी येथील प्रत्येकाची भावना आहे, असे राम प्रसाद म्हणाले.काँग्रेसची वॉर रुमकेसीआर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया टीम तयार केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंन्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवरून मतदारांपर्यंत पोचण्याची मोहीम सुरु केली आहे. जवळपास ६ हजार ग्रुपमधून दररोज दीड लाख लोकांपर्यंत पोहोचून प्रचार केला जात आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवून आपली भूमिका मांडली जात आहे. हैदराबादमध्ये याचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन केले आहे. काँग्रेसचे ५५ निष्ठावान कार्यकर्ते या टीममध्ये आहेत. मदनमोहन राव हे या वॉर रुमचे प्रमुख आहेत. भाजपने देशभर जी स्ट्रॅटेजी वापरली, तीच स्ट्रॅटेजी तेलंगणात वापरली जात आहे. याच सोशल मीडिया टीमने काँग्रेसच्या नेत्या व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हिंदीतील भाषणाचा व्हिडिओ तयार करून, तो राज्यातील मतदारांपर्यंत सोशल मीडियामार्फत पाठवला आहे.>योगी अंगठा छाप; अकबरुद्दीन ओवेसी यांनी घेतला खरपूस समाचारतेलंगणात सत्ता आल्यास ओवेसींना निजामांसारखे पळवून लावू, असे म्हणणाºया योगी आदित्यनाथ यांचा अकबरुद्दीन ओवेसी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. योगी तु्म्ही अंगठा छाप आहात, जर सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते की निजाम पळून गेले नव्हते. ही भाषा योगींची नाही तर मोदींची आहे, असा प्रतिहल्ला ओवेसींनी चढवला.निजाम पळून गेले होते, या योगींच्या या वक्तव्यावर ओवेसी म्हणाले की, ‘योगी तुम्ही अंगठा छाप आहात. तुमचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे.तुम्ही सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते, की निजाम सोडून पळाले नव्हते. तर त्यांना भारत सरकारने राज्यपाल केले होते. जेव्हा चीनशी युद्ध झाले, त्यावेळी निजामांनी देशाला सोने दान केले होते. त्याबद्दल भारत सरकारने नंतर त्यांचे कौतुकही केले होते. पण तुम्ही म्हणता निजाम पळून गेले होते. ही तुमची नव्हे, तर मोदींची भाषा आहे.’

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018