शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उत्तर, पूर्व भारतात पुराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:08 IST

बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मेघालयातील पूरस्थिती जैसे थे असताना उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि बहराईीच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पुराने १७ जणांचा बळी घेतला.

नवी दिल्ली : बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मेघालयातील पूरस्थिती जैसे थे असताना उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि बहराईीच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पुराने १७ जणांचा बळी घेतला. बाराबंकी, गोंदा, सिद्धार्थनगर, महाराजगंज जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराने थैमान घातले असून, या जिल्ह्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.बिहारमधील अधिकच गंभीरअसून,पुराच्या तडाख्याने आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांतील ९३ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बहुतांश भागातील जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाला परीक्षा रद्द करणे व काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक बंद करणे भाग पडले आहे.नेपाळ आणि बिहारच्या उत्तरेकडील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराचा जोर वाढला आहे. बुधवारपर्यंत मृतांचा आकडा ७२ होता. तो आता ९८ वर गेला आहे. सहारसा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत सात जण पुरात वाहून गेले. मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. बहराईचमध्ये मागील तीन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला. घागरा आणि शरयू नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापोर, पश्चिम मिदनापोर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगली आणि झारग्राम जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.