शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर, पूर्व भारतात पुराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:08 IST

बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मेघालयातील पूरस्थिती जैसे थे असताना उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि बहराईीच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पुराने १७ जणांचा बळी घेतला.

नवी दिल्ली : बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मेघालयातील पूरस्थिती जैसे थे असताना उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि बहराईीच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पुराने १७ जणांचा बळी घेतला. बाराबंकी, गोंदा, सिद्धार्थनगर, महाराजगंज जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराने थैमान घातले असून, या जिल्ह्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.बिहारमधील अधिकच गंभीरअसून,पुराच्या तडाख्याने आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांतील ९३ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बहुतांश भागातील जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाला परीक्षा रद्द करणे व काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक बंद करणे भाग पडले आहे.नेपाळ आणि बिहारच्या उत्तरेकडील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराचा जोर वाढला आहे. बुधवारपर्यंत मृतांचा आकडा ७२ होता. तो आता ९८ वर गेला आहे. सहारसा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत सात जण पुरात वाहून गेले. मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. बहराईचमध्ये मागील तीन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला. घागरा आणि शरयू नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापोर, पश्चिम मिदनापोर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगली आणि झारग्राम जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.