शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नोटाबंदी तर आर्थिक दहशतवादच! यशवंत सिन्हा पुन्हा कडाडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:00 IST

नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत

अकोला : नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला. ते अकोला येथे बोलत होते.शेतकरी जागर मंचच्यावतीने सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नोटाबंदी, जीएसटी आणि अर्थव्यवस्थेवरून सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आपल्या टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, माझ्या लेखानंतर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया या देशात काहीतरी चुकत आहे, हे स्पष्ट करणाºया आहेत. हे चांगले संकेत आहेत. सरकार चुकत आहे, हे कुणीतरी सांगितले पाहिजे. त्यासाठी राजशक्तीपेक्षाही मोठी शक्ती असलेल्या लोकशक्तीचा लढा उभारण्याची गरज आहे.देशाची अर्थव्यवस्था सध्या विचित्र स्थितीत आहे. शेतकरी संकटात, व्यापारी त्रस्त, युवकांना नव्या नोकºया नाहीत, त्यामुळे समाजातील कोणताच घटक खुश नाही. मुळात जीएसटीमध्येच अनेक त्रुटी आहेत. त्यामुळेच हा ‘गुड अ‍ॅण्ड सिम्पल’ टॅक्स न राहता ‘बॅड अ‍ॅण्ड कॉम्प्लिकेटेड’ टॅक्स झाला आहे. जीएसटीमधील विसंगती दूर करा, अन्यथा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका होईल, असा इशाराही त्यांनी दिला.नोटाबंदी ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वच व्यवहार आॅनलाइन करण्याचा निर्णय झाला. लाइनही नाही अन् आॅनही नाही, असा हा हास्यास्पद प्रकार ठरला. बदल वेगाने होत नसतात, त्याची गती किमान एका लयीत असावी लागते. नोटाबंदीनंतर दोन लाख शेअर कंपन्यांची व १८ लाख लोकांची चौकशी सुरू झाली आहे, हे नोटाबंदीचे वास्तव आहे, यावर काय बोलावे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.या सरकारचे शेतीचे धोरणही अजबच आहे. महाराष्टÑात नाफेडने शेतकºयांकडून तूर, मूग, उडीद खरेदीचा निर्णय घेतला; मात्र प्रतिएकर दोन क्विटंल खरेदीची टाकलेली अट ही हास्यास्पद आहे. जर उत्पादनच एकरी पाच ते आठ क्विंटल असेल, तर खरेदीला बंधन का? ही अट तत्काळ कमी केली पाहिजे, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.‘मित्रों’ टाळणार म्हटले; पण आलेच!यशवंत सिन्हा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना बंधू-भगिनींनो, अशी केली आणि जाणीवपूर्वक ‘मित्रों’ म्हटले नाही, असे स्पष्टीकरण दिल्यावर सभागृहात हशा उमटत टाळ्यांचा गजर झाला; मात्र सिन्हा यांनी भाषणाच्या ओघात दोन वेळा ‘मित्रों’ म्हटल्यावर त्यांनी अब क्या करे, सुनने की आदत पडी, असे सांगत दोस्तों असे म्हणणार असल्याचे स्पष्ट करून सभागृहाचे लक्ष वेधले....तर लेख कशाला लिहिला असता ?मला अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडत नाही? मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता? असा सवाल सिन्हा यांनी केला.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाNote Banनोटाबंदी