शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 18:54 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल करार आणि नोटाबंदीवरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदी ही चूक नव्हती, तर जनता आणि छोट्या व्यावसायिकांवर आक्रमणं होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. देशातल्या 15 मोठ्या उद्योजकांच्या भल्यासाठीच मोदी सरकारनं नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.भ्रष्टाचा-यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदी केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. नोटाबंदीच्या माध्यमातून सरकारनं जनतेवर आक्रमण केले. नोटाबंदीमुळे छोट्या व्यापा-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.भाजपा अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या गुजरातमधल्या बँकेत 700 कोटींचा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात 700 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यात आले. जनतेच्या खिशातील पैसा उद्योजकांच्या गल्ल्यात जमा करण्याचे काम मोदी सरकारनं केले. जनतेची लुबाडणूक करण्याचं काम मोदींनी केलं आहे.नोटाबंदीच्या निर्णयातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. नोटाबंदी हा जुमला नव्हे, तर एक मोठा भ्रष्टाचार ठरला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, बेरोजगारी संपवण्याचं मोदींनी दिलेलं आश्वासनं हवेत विरली आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डील