शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:14 IST

नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे

मुंबई : नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेआहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केली.विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोटाबंदी आणि जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चिदंबरम बोलत होते. याप्रसंगीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते गुरुदास कामत, संजय निरुपम, नसीम खान, जनार्दन चांदूरकर आदी नेते उपस्थित होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले.आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे लक्ष नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेले नुकसान रोखण्याची अजूनही संधी आहे. परंतु आपला निर्णय चुकल्याचे या सरकारला मान्यच करायचे नाही. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता लोकांनीच योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे चिदंबरम म्हणाले.काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास जीएसटी करप्रणालीत सुधारणाकेली जाईल. १८ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारला जाणारनाही. छोट्या आणि मध्यमउद्योगांना सहा महिन्यांतून एकदाच रिटर्न भरावा लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.शेतकी उत्पन्न, नोकºया, घटते बालमृत्यूदर आणि निर्यात ही चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. सध्या देशात या चारही घटकांची स्थिती चांगली नाही. देश सध्या रोजगारशून्य विकास अनुभवत असून असा विकास टाइमबॉम्बसारखा असतो. नवीन रोजगारही तयार झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीला धाडसी निर्णय म्हणत असले तरी हानिर्णय शेतकºयांच्या आत्महत्यांप्रमाणे आहे. आत्महत्येचा निर्णयही धाडसी असला तरी चुकीचा असतो, असेही चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNote BanनोटाबंदीGSTजीएसटीBJPभाजपा