शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:14 IST

नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे

मुंबई : नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेआहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केली.विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोटाबंदी आणि जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चिदंबरम बोलत होते. याप्रसंगीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते गुरुदास कामत, संजय निरुपम, नसीम खान, जनार्दन चांदूरकर आदी नेते उपस्थित होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले.आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे लक्ष नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेले नुकसान रोखण्याची अजूनही संधी आहे. परंतु आपला निर्णय चुकल्याचे या सरकारला मान्यच करायचे नाही. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता लोकांनीच योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे चिदंबरम म्हणाले.काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास जीएसटी करप्रणालीत सुधारणाकेली जाईल. १८ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारला जाणारनाही. छोट्या आणि मध्यमउद्योगांना सहा महिन्यांतून एकदाच रिटर्न भरावा लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.शेतकी उत्पन्न, नोकºया, घटते बालमृत्यूदर आणि निर्यात ही चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. सध्या देशात या चारही घटकांची स्थिती चांगली नाही. देश सध्या रोजगारशून्य विकास अनुभवत असून असा विकास टाइमबॉम्बसारखा असतो. नवीन रोजगारही तयार झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीला धाडसी निर्णय म्हणत असले तरी हानिर्णय शेतकºयांच्या आत्महत्यांप्रमाणे आहे. आत्महत्येचा निर्णयही धाडसी असला तरी चुकीचा असतो, असेही चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNote BanनोटाबंदीGSTजीएसटीBJPभाजपा