शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:14 IST

नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे

मुंबई : नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेआहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केली.विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोटाबंदी आणि जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चिदंबरम बोलत होते. याप्रसंगीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते गुरुदास कामत, संजय निरुपम, नसीम खान, जनार्दन चांदूरकर आदी नेते उपस्थित होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले.आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे लक्ष नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेले नुकसान रोखण्याची अजूनही संधी आहे. परंतु आपला निर्णय चुकल्याचे या सरकारला मान्यच करायचे नाही. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता लोकांनीच योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे चिदंबरम म्हणाले.काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास जीएसटी करप्रणालीत सुधारणाकेली जाईल. १८ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारला जाणारनाही. छोट्या आणि मध्यमउद्योगांना सहा महिन्यांतून एकदाच रिटर्न भरावा लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.शेतकी उत्पन्न, नोकºया, घटते बालमृत्यूदर आणि निर्यात ही चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. सध्या देशात या चारही घटकांची स्थिती चांगली नाही. देश सध्या रोजगारशून्य विकास अनुभवत असून असा विकास टाइमबॉम्बसारखा असतो. नवीन रोजगारही तयार झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीला धाडसी निर्णय म्हणत असले तरी हानिर्णय शेतकºयांच्या आत्महत्यांप्रमाणे आहे. आत्महत्येचा निर्णयही धाडसी असला तरी चुकीचा असतो, असेही चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNote BanनोटाबंदीGSTजीएसटीBJPभाजपा