शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:07 IST

पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचं पाकिस्तानकडून जगाला सांगितलं जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प बंद केले जात असल्याचा दावा शेजारी देशाकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या दाव्याबद्दल लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शंका व्यक्त केली. पाकिस्तानकडून खरंच दहशतवाद्यांचे तळ बंद केले जात आहेत का, हे तपासून पाहणं अवघड आहे. त्यामुळे भारताकडून केली जाणारी सीमांवरील निगराणी सुरुच राहील, असं रावत म्हणाले.  पाकिस्तानकडून केला जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं रावत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं. आपल्या देशाची जमीन दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जात नाही, देशातून दहशतवादी कारवाया केल्या जात नाहीत, असे दावे पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहेत. यानंतर आता पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केले जात असल्याचा दावा केला आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव आल्यानंतर पाकिस्ताननं अनेकदा असे दावे केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान सरकारच्या किंवा पाकिस्तानी लष्कराच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं रावत अप्रत्यक्षपणे म्हणाले. पाकिस्तानकडून दहशतवादी तळ बंद केले जात आहेत की नाही, याची पडताळणी करुन पाहता येणं अतिशय अवघड असल्याचंदेखील रावत यांनी म्हटलं. 'पाकिस्तानात एक-दोन दहशतवादी तळ नाहीत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी अनेक तळ उभारले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात येतं,' असंदेखील लष्कर प्रमुखांनी सांगितलं. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी