शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:07 IST

पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचं पाकिस्तानकडून जगाला सांगितलं जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प बंद केले जात असल्याचा दावा शेजारी देशाकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या दाव्याबद्दल लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शंका व्यक्त केली. पाकिस्तानकडून खरंच दहशतवाद्यांचे तळ बंद केले जात आहेत का, हे तपासून पाहणं अवघड आहे. त्यामुळे भारताकडून केली जाणारी सीमांवरील निगराणी सुरुच राहील, असं रावत म्हणाले.  पाकिस्तानकडून केला जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं रावत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं. आपल्या देशाची जमीन दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जात नाही, देशातून दहशतवादी कारवाया केल्या जात नाहीत, असे दावे पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहेत. यानंतर आता पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केले जात असल्याचा दावा केला आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव आल्यानंतर पाकिस्ताननं अनेकदा असे दावे केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान सरकारच्या किंवा पाकिस्तानी लष्कराच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं रावत अप्रत्यक्षपणे म्हणाले. पाकिस्तानकडून दहशतवादी तळ बंद केले जात आहेत की नाही, याची पडताळणी करुन पाहता येणं अतिशय अवघड असल्याचंदेखील रावत यांनी म्हटलं. 'पाकिस्तानात एक-दोन दहशतवादी तळ नाहीत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी अनेक तळ उभारले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात येतं,' असंदेखील लष्कर प्रमुखांनी सांगितलं. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी