शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पीओकेतील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून बंद?; लष्करप्रमुख म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:07 IST

पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचं पाकिस्तानकडून जगाला सांगितलं जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प बंद केले जात असल्याचा दावा शेजारी देशाकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या दाव्याबद्दल लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शंका व्यक्त केली. पाकिस्तानकडून खरंच दहशतवाद्यांचे तळ बंद केले जात आहेत का, हे तपासून पाहणं अवघड आहे. त्यामुळे भारताकडून केली जाणारी सीमांवरील निगराणी सुरुच राहील, असं रावत म्हणाले.  पाकिस्तानकडून केला जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं रावत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं. आपल्या देशाची जमीन दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जात नाही, देशातून दहशतवादी कारवाया केल्या जात नाहीत, असे दावे पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहेत. यानंतर आता पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केले जात असल्याचा दावा केला आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव आल्यानंतर पाकिस्ताननं अनेकदा असे दावे केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान सरकारच्या किंवा पाकिस्तानी लष्कराच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं रावत अप्रत्यक्षपणे म्हणाले. पाकिस्तानकडून दहशतवादी तळ बंद केले जात आहेत की नाही, याची पडताळणी करुन पाहता येणं अतिशय अवघड असल्याचंदेखील रावत यांनी म्हटलं. 'पाकिस्तानात एक-दोन दहशतवादी तळ नाहीत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी अनेक तळ उभारले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात येतं,' असंदेखील लष्कर प्रमुखांनी सांगितलं. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी