शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:20 IST

बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया (व्हीआयएल) ने स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांशी संबंधित १६ हजार कोटींच्या व्याजाची रक्कम आणि एजीआर थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिल्यानंतर व्होडाफोनआयडियावर सरकारचे नियंत्रण येणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या कंपनीचा ताबा घेण्यास इच्छुक नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

व्हीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर यांनी बुधवारी म्हटले की, सध्याचे प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चालवण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत. सरकारने व्यवस्थापन ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सरकारने पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केल्याने या क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. व्हीआयएल रक्कम उभारणीसाठी आपल्या याेजना सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या कंपनीत आता केंद्र सरकारची हिस्सेदारी ३५.८ टक्के असणार आहे. जर असे झाले तर सरकार कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक होणार आहे. कंपनीवर सध्या १.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ठक्कर म्हणाले की, थकबाकीवरील व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याच्या पर्यायाबाबत दूरसंचार विभागाच्या पत्रात सरकारला संचालक मंडळावर ठेवण्याची कोणतीही अट नाही. ते पुढे म्हणाले की, विद्यमान प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन हाती घेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत.

सरकार म्हणते, तुम्हीच कंपनी चालवा आणि पुढे न्या

कंपनी ताब्यात घेण्याची सरकारची कोणतीही इच्छा नाही. सरकारला बाजारात तीन खासगी कंपन्या हव्या आहेत. बाजारामध्ये केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी सरकारला नको आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनीच कंपनी चालवावी आणि ती पुढे न्यावी, असे सरकारने स्पष्ट केले असल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे. येणाऱ्या महिन्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया