शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:20 IST

बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया (व्हीआयएल) ने स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांशी संबंधित १६ हजार कोटींच्या व्याजाची रक्कम आणि एजीआर थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिल्यानंतर व्होडाफोनआयडियावर सरकारचे नियंत्रण येणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या कंपनीचा ताबा घेण्यास इच्छुक नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

व्हीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर यांनी बुधवारी म्हटले की, सध्याचे प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चालवण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत. सरकारने व्यवस्थापन ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सरकारने पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केल्याने या क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. व्हीआयएल रक्कम उभारणीसाठी आपल्या याेजना सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या कंपनीत आता केंद्र सरकारची हिस्सेदारी ३५.८ टक्के असणार आहे. जर असे झाले तर सरकार कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक होणार आहे. कंपनीवर सध्या १.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ठक्कर म्हणाले की, थकबाकीवरील व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याच्या पर्यायाबाबत दूरसंचार विभागाच्या पत्रात सरकारला संचालक मंडळावर ठेवण्याची कोणतीही अट नाही. ते पुढे म्हणाले की, विद्यमान प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन हाती घेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत.

सरकार म्हणते, तुम्हीच कंपनी चालवा आणि पुढे न्या

कंपनी ताब्यात घेण्याची सरकारची कोणतीही इच्छा नाही. सरकारला बाजारात तीन खासगी कंपन्या हव्या आहेत. बाजारामध्ये केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी सरकारला नको आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनीच कंपनी चालवावी आणि ती पुढे न्यावी, असे सरकारने स्पष्ट केले असल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे. येणाऱ्या महिन्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया