शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

फोन टॅपिंगबाबत एनएसओशी कोणताही व्यवहार केला नाही; केंद्र सरकारची संसदेत स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:38 IST

पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता.

नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्यासंदर्भात इस्रायली कंपनी एनएसओबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी स्पष्ट केले आहे.पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता. या पाळत प्रकरणावरून विरोधकांनी संसदेच्या कामकाजात अडथळे आणले होते. पेगॅसससंदर्भात माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवदासन यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना अजय भट म्हणाले की, पेगॅससची निर्मिती करणाऱ्या एनएसओ ग्रुप या कंपनीबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही. कोणावरही अवैधरित्या पाळत ठेवण्यात आलेली नाही असे केंद्र सरकारने याआधी स्पष्ट केले होते. मात्र त्याने समाधान न झाल्याने खासदार डाँ. शिवदासन यांनी एनएसओबाबत सरकारला थेट प्रश्न विचारला होता. पेगॅसस प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. पेगॅसस तंत्रज्ञान फक्त कोणत्याही सरकारला व त्याच्या यंत्रणांनाच विकण्यात येते असे एनएसओ कंपनीने म्हटले होते. त्यामुळेही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.