शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फोन टॅपिंगबाबत एनएसओशी कोणताही व्यवहार केला नाही; केंद्र सरकारची संसदेत स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:38 IST

पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता.

नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्यासंदर्भात इस्रायली कंपनी एनएसओबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी स्पष्ट केले आहे.पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता. या पाळत प्रकरणावरून विरोधकांनी संसदेच्या कामकाजात अडथळे आणले होते. पेगॅसससंदर्भात माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवदासन यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना अजय भट म्हणाले की, पेगॅससची निर्मिती करणाऱ्या एनएसओ ग्रुप या कंपनीबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही. कोणावरही अवैधरित्या पाळत ठेवण्यात आलेली नाही असे केंद्र सरकारने याआधी स्पष्ट केले होते. मात्र त्याने समाधान न झाल्याने खासदार डाँ. शिवदासन यांनी एनएसओबाबत सरकारला थेट प्रश्न विचारला होता. पेगॅसस प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. पेगॅसस तंत्रज्ञान फक्त कोणत्याही सरकारला व त्याच्या यंत्रणांनाच विकण्यात येते असे एनएसओ कंपनीने म्हटले होते. त्यामुळेही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.