कोलकाता - पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर थेट शब्दांत हल्ला चढवला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुमचा हा उत्साह आणि जोश बंगालच्या मनात काय चालले आहे, हे स्पष्टप करणारा आहे. ब्रिगेड परेड ग्राउंडचा इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा बंगाल देशाला दिशा देतो, तेव्हा हे मैदान बंगालचा आवाज बनते. एकेकाळी याच मैदानातून इंग्रजी सत्तेविरुद्ध उठलेला आवाज संपूर्ण भारतात क्रांतीचे रूप धारण करून उठला होता, ज्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांच्या अत्याचाराचा आणि लुटीचा शेवट झाला. आज पुन्हा एकदा याच मैदानातून नव्या बंगालच्या क्रांतीचे बिगुल वाजले आहे."
बंगालमधील बदलाचे वारे आता केवळ भिंतींवर लिहिलेले नाही, तर लोकांच्या मनातही दिसत आहेत, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, "आता बंगालमधील या 'निर्दयी' सरकारचा अंत निश्चित आहे. राज्यातील महाजंगलराज आता संपुष्टात येईल, म्हणूनच बंगालच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येत आहे - 'चाई बीजेपी सरकार, अबकी बार'!"
'खरा चोर कोण, हे जनता जाणते -सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांना तृणमूल काँग्रेसने 'चोर' म्हणून हिणवल्याचा उल्लेख करत मोदींनी संताप व्यक्त केला. "खरे चोर कोण? हे बंगालची सुजाण जनता चांगल्या प्रकारे ओळखते. आपली सत्ता जात असल्याचे पाहून येथील सरकार आता सैरभैर झाले आहे. आम्ही टीएमसीच्या कुण्याही अत्याचाऱ्याला सोडणार नाही, एकाएकाचा हिशोब चुकता करू," असा थेट इशाराही यावेळी मोदी यांनी दिला.
Web Summary : Prime Minister Modi addressed a Kolkata rally, attacking Mamata Banerjee's TMC government. He promised accountability for TMC's wrongdoings, stating Bengal desires change and the current government's end is near, promising BJP's governance.
Web Summary : प्रधानमंत्री मोदी ने कोलकाता में रैली को संबोधित करते हुए ममता बनर्जी की टीएमसी सरकार पर हमला किया। उन्होंने टीएमसी के गलत कामों के लिए जवाबदेही का वादा किया, और कहा कि बंगाल बदलाव चाहता है और वर्तमान सरकार का अंत निकट है, भाजपा के शासन का वादा किया।