शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

'निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही, आंदोलनच ठरविणार निवडणुकीची दिशा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:22 IST

पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.

गजानन चोपडे -

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण किंवा भारतीय किसान युनियनने कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन दिलेले नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. तर, समाजवादी पक्ष-रालोद आघाडीच्या एखाद्या उमेदवाराला आशीर्वाद दिला म्हणजे कोणत्या तरी पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा दिला असे होत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत टिकैत यांची भाजपविरोधी धार कमी झाल्याचे जाणवले.पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.तेरा महिन्यांचे ते आंदोलनच या निवडणुकीची दिशा ठरविणार असल्याचे सांगत सरकारविरोधी आपली भूमिका असल्याचे संकेत राकेश टिकैत यांनी दिले. या आंदोलनात राकेश टिकैत यांनी फ्रंटफूटवर किल्ला लढवला. त्यांनी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध कणखर भूमिका घेतली. त्यामुळेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी समाजवादी पक्ष व जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने एमएसपी गॅरंटी कायदा लागू केला, तर त्याचा लाभ अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालादेखील होईल. तेथेदेखील भूसंपादन, पाणी तथा पिकांच्या दराचा प्रश्न कायम आहे. ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील यवतमाळला येणारदेखील होतो. मात्र, कोरोना नियमावलीमुळे ते शक्य झाले नाही. तेथेदेखील कापूस, धान, संत्रा अशा पिकांना उत्पादन मूल्यावर आधारित दर मिळत नाही. तेथील हजारो लोक दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले. उभ्या देशातील भूमिपुत्रांसाठी लढताना कुण्या एका पक्षाला तसा पाठिंबा देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.

बजेटमध्ये  कुठे आहे शेतकरी?दोन दिवसांपूर्वी सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये शेतकरी कुठेच दिसत नाही, ते या निवडणुकीत दिसणार असल्याचा दावा टिकैत यांनी केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कितीही आकडेवारी सादर करत असले तरी ऊस उत्पादक अद्याप लाभापासून वंचित आहेत, असे म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. खासदार संजय राऊत नुकतेच भेटीला आले होते. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्नांवर चर्चा केल्याचे टिकैत सांगतात. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२