शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 07:56 IST

लसीकरणाच्या दुष्परिणामांचा ट्रॅक ठेवण्यासाठी 'ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन' (AEFI) नावाची मजबूत देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाची लस घेतल्याने भारतातील तरुण आणि प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही. कोरोना लस अशा मृत्यूची शक्यता कमी करते. ICMR नं त्यांच्या रिपोर्टमधून गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुण आणि प्रौढांचे अकाली मृत्यू हे कोरोना लसीकरणाशी संबंधित असल्याची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा स्टडी रिपोर्ट सादर केला. 

रिसर्चसाठी १९ राज्यातून घेतले नमुने

ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने १८ ते ४५ वयोगटातील अशा लोकांवर अभ्यास केला जे निरोगी होते आणि त्यांना कुठलाही आजार नव्हता. १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या काळात अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यामागचे कारण अस्पष्ट होते. हा रिसर्च १९ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ रुग्णालयात घेण्यात आला. रिसर्चवेळी ७२९ नमुने घेण्यात आले ज्यात अचानक मृत्यू झाला होता. २९१६ नमुने असे होते ज्यांना हार्टअटॅकनंतरही वाचवण्यात आले होते. या रिसर्चमध्ये समोर आलं की, कोविड १९ लसीची कमीत कमी १ किंवा २ डोस घेतल्याने विना कोणत्या कारणाशिवाय अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. 

संशोधनात अचानक मृत्यूचा धोका वाढवणारे अनेक घटक देखील समोर आले आहेत ज्यात मृत व्यक्तीचे कोविड-१९ रुग्णालयात दाखल करणे, कुटुंबातील एखाद्याचा अचानक मृत्यू, मृत्यूच्या ४८ तास आधी जास्त मद्यपान करणे, अंमली पदार्थांचं वापर आणि मृत्यूपूर्वी ४८ तासांत जास्त शारीरिक हालचाली (जिममधील व्यायामासह) यांचा समावेश आहे. आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार, कोविड-१९ लसीकरण आणि तरुण प्रौढांचा अचानक मृत्यू यांचा काहीही संबंध नाही. त्याऐवजी, कोविड-१९ हॉस्पिटलायझेशनचा इतिहास, कुटुंबातील अशा आकस्मिक मृत्यूंचा इतिहास आणि विशिष्ट जीवनशैलीतील वर्तणूक यासारख्या घटकांमुळे अशा मृत्यूची शक्यता वाढते असं केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले. 

दरम्यान, लसीकरणाच्या दुष्परिणामांचा ट्रॅक ठेवण्यासाठी 'ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन' (AEFI) नावाची मजबूत देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. ॲनाफिलेक्सिस किट लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या जातात आणि लसीकरणानंतर व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले जाते. AEFI बद्दल जागरुकता वाढवण्यासाठी लसीच्या दुष्परिणामांशी संबंधित प्रकरणांचा अहवाल वाढवण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जनजागृतीसाठी सरकार सोशल मीडियाचा वापर करत आहे अशी माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्र्‍यांनी दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRajya Sabhaराज्यसभाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाcorona virusकोरोना वायरस बातम्या