शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

गांधीजींबाबत नाही आदर अन् ‘सोनार बांगला’ची भाषा; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:09 AM

भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणापासून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे.

कोलकाता : महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आदर नसलेले आता ‘सोनार बांगला’ची भाषा बोलत आहेत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. सध्या बंगालची अस्मिता संपवण्याचे ठरवून प्रयत्न सुरू आहेत. हे हिंसाचार आणि विभाजनवादी राजकारण थांबले पाहिजे, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी बीरभूम जिल्ह्यातील बोलापूर येथील रॅलीमध्ये केले.

रॅलीमध्ये बॅनर्जी म्हणाल्या की, रवींद्रनाथ टागोर यांनी काही दशकांपूर्वीच सोनार बांगला (सोनेरी बंगाल) निर्माण केला होता. भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणापासून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे. भाजप विश्वभारती युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या म्हणाल्या की, विश्वभारती युनिव्हर्सिटीच्या निमित्ताने गलिच्छ राजकारण केले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली विद्वेष पसरवला जात आहे. युनिव्हर्सिटीचे कुलगुरु हे भाजपचे आहेत.

जातीय राजकारणासाठी ते युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची खरेदी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, पैशाच्या बळावर भ्रष्ट आमदारांची खरेदी करून आमच्या पक्षाची पाळेमुळे नष्ट करता येणार नाहीत. 

ते जेवण फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी यावेळी प्रखर टीका केली. त्या म्हणाल्या की, अलीकडेच अमित शहा यांनी बंगालच्या ख्यातनाम लोकसंगीतकारांच्या घरी जेवण घेतले. परंतु हा केवळ देखावा होता. त्यांनी त्यावेळी घेतलेले जेवण भाजप नेत्यांनी फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा