शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ओबीसींचे आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारनं संसदेत केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 08:57 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येनुसार इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षण वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्राने बुधवारी राज्यसभेत सांगितले. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही माहिती दिली.

संविधानाच्या कलम २४३-ड अंतर्गत ओबीसींना एकतृतीयांश आरक्षण दिले जाते. तथापि, २१ राज्य सरकारांनी आरक्षणात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. एका सदस्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येनुसार ओबीसींसाठी आरक्षण वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव नाही, असे पाटील म्हणाले.

सर्वस्वी अधिकार राज्य सरकारला

ओबीसींना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. या विषयावर, राज्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतला पाहिजे, असे कपिल पाटील प्रश्नोत्तराच्या तासावेळी दुसऱ्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. ओबीसी कोट्याच्या मुद्यांमुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. इम्पेरिकल डेटाच्या आकडेवारीशिवाय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. त्यातच ओबीसी, एसी, एसटींना सामावून घेण्याची तरतूद आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 

मराठा, मागासांना आरक्षण द्या : राऊत

महाराष्ट्रातील मराठा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास जातींना आरक्षण देण्यात यावे, अशी  मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली. जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक व जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेप्रसंगी राऊत म्हणाले की, २५ वर्षांपासून मराठा, धनगर, महादेव कोळी यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणCentral Governmentकेंद्र सरकार