शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"तुमच्या जमिनीवर कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही: संपत्ती स्वामित्व योजनेला सुरुवात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:48 IST

आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल, पंतप्रधान मोदी यांनी स्वामित्व योजनेंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपत्तीकार्डचे वितरण सुरू केले.

नवी दिल्ली : तुमच्या जमीन वा अन्य संपत्तीवर आता कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही, असा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेला रविवारी सुरुवात केली. संपत्ती स्वामित्व अधिकार देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी स्वामित्व योजनेंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपत्तीकार्डचे वितरण सुरू केले. ग्रामीण भारताला बदलणारा हा महत्त्वाचा निर्णय असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, यामुळे ग्रामीण भागातील लोक आपली जमीन आणि संपत्ती आर्थिक मालमत्ता म्हणून वापर करू शकतील. त्यामुळे ते बँकांतून कर्ज व अन्य आर्थिक लाभ घेऊ शकतील. तसेच, जमिनीच्या मालकीवरूनचे वाद समाप्त होतील.पंतप्रधान बोलत होते तेव्हा त्यांच्यामागे लोकनायक जयप्रकाश नारायण व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख यांचे फोटो होते. दोघांचीही रविवारी जयंती होती. मोदी म्हणाले की, नानाजी देशमुख यांचे मत होते की, जोवर गावचे लोक वादात अडकून राहतील, तोवर ते आपला विकास करू शकणार नाहीत, समाजाच्या विकासातही भूमिका पार पाडू शकणार नाहीत.तरुणांना मिळेल आत्मविश्वासते म्हणाले की, संपत्ती स्वामित्व अधिकार देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जगात केवळ एकतृतीयांश लोकांकडेच संपत्तीची कायदेशीर मालकी आहे. ग्रामीण भागातील तरुण आपल्या संपत्तीच्या आधारे बँकांचे कर्ज घेऊ शकतील. हा अधिकार तरुणांना आत्मविश्वास देईल. यातील लाभार्थी सहा राज्यांतील ७६३ गावांत आहेत. उत्तर प्रदेशातील ३४६, हरयाणा २२१, महाराष्ट्र १००, मध्य प्रदेश ४४, उत्तराखंड ५० व कर्नाटकातील दोन गावे यात आहेत.प्रत्येक कुटुंबाला देणार संपत्तीकार्डमोदी म्हणाले की, आमचे सरकार आगामी तीन-चार वर्षांत प्रत्येक कुटुंबाला याप्रकारचे संपत्तीकार्ड देण्याचा प्रयत्न करणार आहे. पीएमओ कार्यालयाने सांगितले की, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवळपास एक लाख संपत्तीमालक आपल्या संपत्तीशी संबंधित कार्ड आपल्या मोबाइलवर प्राप्त एसएमएस लिंकच्या माध्यमातून डाउनलोड करू शकतील. त्यानंतर, संबंधित राज्य सरकारे संपत्तीकार्डचे वितरण करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार