शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

देवेगौडा पंतप्रधान असताना एकही हल्ला झाला नाही, मग आताच का?, कुमारस्वामी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:53 IST

एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत.

बंगळुरू : एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत. मग ते आताच का होत आहेत, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी यांनी विचारला आहे.म्हैैसूर येथे शुक्रवारी एका जाहीर सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरला जाताना अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था लागते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात उघड्या जीपमधून व सुरक्षेचा बडेजाव न माजविता एकच पंतप्रधान फिरले ते म्हणजे देवेगौडा. ही वस्तुस्थिती जनतेने कधीच विसरू नये. भारत व पाकिस्तानमध्ये सध्या विलक्षण तणाव निर्माण झाला असून, त्यातून भविष्यात नेमकी काय स्थिती उद्भवेल हे आताच सांगणे कठीण आहे.कुमारस्वामी म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केल्याबद्दल भाजपाने देशभर तिरंगा ध्वज फडकावत जल्लोष केला. त्या पक्षाच्या अशा वागण्यामुळे तणाव आणखी वाढणार आहे. जणूकाही स्वत:च विमाने चालवून पाकिस्तानवर बॉम्बफेक केली, अशा थाटात भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरू होता. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी देशाशी निगडित संवेदनशील गोष्टींचा भाजपा गैरवापर करीत आहे. (वृत्तसंस्था)>व्हिडिओत फेरफारआपण शुक्रवारी केलेल्या भाषणाची व्हिडिओ फीत फेरफार करून टिष्ट्वटरवर झळकविण्यात आली, असा आरोप कुमारस्वामी यांनी भाजपावर केला आहे. या भाषणाची संपूर्ण व्हिडिओ फीत कुमारस्वामींनी टिष्ट्वटरवर उपलब्ध करून दिली आहे. लष्कर नव्हे तर स्वत:च युद्धभूमीत लढले असावे, असा भाजपा नेत्यांचा आवेश आहे, असे मी माझ्या भाषणात म्हटले होते. त्यातील काही शब्द वगळून या भाषणाची व्हिडिओ फीत भाजपाने झळकविल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला.

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी