शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:54 IST

Amit Shah in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला.

गृहमंत्री अमित शाहअरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, भारत-चीन सीमेजवळील किबिथू गावात चीनचे नाव न घेता अमित शाह म्हणाले की, आज संपूर्ण देश शांततेत झोपला आहे, कारण आमचे आयटीबीपी जवान आणि लष्कर रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत. आमच्याकडे वाईट नजर टाकण्याची कोणाची हिंमत नाही.

अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शाह यांचा अरुणाचल प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. ते म्हणाले, 2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. पण, गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे ईशान्य हा देशाच्या विकासात योगदान देणारा प्रदेश मानला जातो. 

अमित शाह म्हणाले, "21 ऑक्टोबर 1962 रोजी कुमाऊँ रेजिमेंटचे तत्कालीन 6 अधिकारी येथे शौर्याने लढले आणि ज्यांच्या सहाय्याने भारताच्या भूमीचे रक्षण होऊ शकले, मला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. त्यांची संख्या आणि शस्त्रेही कमी होती. पण 1963 मध्ये टाईम मॅगझिनमध्ये असे लिहिले होते की, किबिथू येथे झालेल्या लढाईत भारतीय सैन्याकडे कमी शस्त्रे होती, परंतु संपूर्ण जगातील सैन्यांमध्ये सर्वात जास्त शौर्य होते."

याचबरोबर, पूर्वी सीमाभागात येणारे लोक म्हणायचे की, ते भारताच्या शेवटच्या गावातून आलो आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नॅरेटिव्ह बदलले आहे. आता इथून गेल्यावर लोक म्हणतात की, मी भारतातील पहिल्या गावातून आलो आहे, असेही अमित शाह म्हणाले. दरम्यान, 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' अंतर्गत, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील उत्तर सीमेवरील 19 जिल्ह्यांच्या 46 ब्लॉकमध्ये 2967 गावे विकसित केली जाणार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश