शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:54 IST

Amit Shah in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला.

गृहमंत्री अमित शाहअरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आमच्या जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, भारत-चीन सीमेजवळील किबिथू गावात चीनचे नाव न घेता अमित शाह म्हणाले की, आज संपूर्ण देश शांततेत झोपला आहे, कारण आमचे आयटीबीपी जवान आणि लष्कर रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत. आमच्याकडे वाईट नजर टाकण्याची कोणाची हिंमत नाही.

अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' (व्हीव्हीपी) सुरू केला. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शाह यांचा अरुणाचल प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. ते म्हणाले, 2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. पण, गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे ईशान्य हा देशाच्या विकासात योगदान देणारा प्रदेश मानला जातो. 

अमित शाह म्हणाले, "21 ऑक्टोबर 1962 रोजी कुमाऊँ रेजिमेंटचे तत्कालीन 6 अधिकारी येथे शौर्याने लढले आणि ज्यांच्या सहाय्याने भारताच्या भूमीचे रक्षण होऊ शकले, मला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. त्यांची संख्या आणि शस्त्रेही कमी होती. पण 1963 मध्ये टाईम मॅगझिनमध्ये असे लिहिले होते की, किबिथू येथे झालेल्या लढाईत भारतीय सैन्याकडे कमी शस्त्रे होती, परंतु संपूर्ण जगातील सैन्यांमध्ये सर्वात जास्त शौर्य होते."

याचबरोबर, पूर्वी सीमाभागात येणारे लोक म्हणायचे की, ते भारताच्या शेवटच्या गावातून आलो आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नॅरेटिव्ह बदलले आहे. आता इथून गेल्यावर लोक म्हणतात की, मी भारतातील पहिल्या गावातून आलो आहे, असेही अमित शाह म्हणाले. दरम्यान, 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' अंतर्गत, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील उत्तर सीमेवरील 19 जिल्ह्यांच्या 46 ब्लॉकमध्ये 2967 गावे विकसित केली जाणार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश