शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

NRC नंबर द्या, अन्यथा Aadhaar Card बनणार नाही; भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:09 IST

आता आधार कार्ड बनवण्यासाठी अर्जदारांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच एनआरसी (NRC) अर्ज पावती क्रमांक (ARN) सबमिट करावा लागणार आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी (दि.७) मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार आधार कार्ड बनवण्याबाबत आणखी कठोर झाले आहे, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले. आता आधार कार्ड बनवण्यासाठी अर्जदारांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच एनआरसी (NRC) अर्ज पावती क्रमांक (ARN) सबमिट करावा लागणार आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी एक तपशीलवार मानक संचालन प्रक्रिया (SOP) तयार केली जाईल आणि ती १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू केली जाईल. एनआरसीची अर्जाचा पावती क्रमांक सबमिट केल्याने बेकायदेशीर परदेशी लोकांचा ओघ थांबेल आणि आधार कार्ड जारी बनवताना राज्य सरकार खूप काटेकोर नियमांचे पालन करेल. दरम्यान, आधार कार्डसाठी अर्ज करणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने खूप जास्त आहेत, यावरून राज्यात संशयास्पद नागरिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आसाम सरकारला आधार कार्डसाठी NRC अर्जाचा पावती क्रमांक सादर करावा लागणार आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांच्या मते, आसाममध्ये आता आधार कार्ड मिळवणे सोपे होणार नाही. इतर राज्येही आधार कार्ड देण्याबाबत कडक भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. एनआरसी अर्ज पावती क्रमांक सादर करणे, त्या ९.५५ लाख लोकांसाठी लागू होणार नाही, ज्यांचे एनआरसी प्रक्रियेदरम्यान बायोमेट्रिक्स लॉक करण्यात आले होते, ज्यांना त्यांची कार्डे मिळतील. तसेच, ही प्रक्रिया चहाच्या मळ्यांच्या भागात लागू होणार नाही. कारण पुरेशा बायोमेट्रिक मशीन्सच्या अनुपलब्धतेसारख्या काही अडचणींमुळे तेथील लोकांना आधार कार्ड मिळालेले नाहीत.

एनआरसी अर्जाचा पावती क्रमांक सबमिट केला तरच मिळेल आधार कार्ड आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील असे चार जिल्हे आहेत, जिथून अंदाजे लोकसंख्येपेक्षा आधार कार्डसाठी जास्त अर्ज आले आहेत. या चार जिल्ह्यांतील बारपेटा येथे १०३.७४ टक्के, धुबरी येथे १०३ टक्के, मोरीगाव आणि नागाव या दोन्ही ठिकाणी १०१ टक्के अर्ज आले आहेत. आधार कार्ड कोणत्याही व्यक्तीला देता येईल की नाही, हे ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्य सरकारांना दिला आहे. अशा स्थितीत आसाम सरकारने निर्णय घेतला आहे की, संबंधित जिल्हा आयुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, तेव्हाच नवीन अर्जदारांना आधार कार्ड दिले जातील. या प्रमाणपत्रांचीही बारकाईने छाननी केली जाणार आहे. अर्जदाराकडे एनआरसी एआरएन असल्यास, तो २०१४ पूर्वी राज्यात होता, हे स्पष्ट होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAssamआसाम