शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

...नव्या कायद्याची गरज पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:37 IST

जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. एका वरिष्ठ अधिका-याने ही माहिती दिली.या अधिकाºयाने सांगितले की, एका मॉडल कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारे जमावाकडून होणाºया हत्या रोखू शकतील. अर्थात, हे सर्व काही प्राथमिक टप्प्यात आहे. कारण, केंद्राला नवा कायदा बनविण्यासाठी सूचना करणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.जर आयपीसीमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर सरकारला याबाबत एखादा नवा कायदा तयार करण्याची गरज पडणार नाही. या अधिकाºयाने सांगितले की, जर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली, तर सीआरपीसी कायद्याच्या काही कलमांत दुरुस्ती करण्याची गरज भासणार आहे.सरकारला याबाबत आपली भूमिका निश्चित करण्यास अनेक दिवस लागू शकतात. सरकार सोशल मीडियाशी संबंधित चौकटही मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून अशा घटनांचे कारण बनलेल्या अफवांवर लगाम लावला जाऊ शकेल. जमावाकडून होणाºया हत्यांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. ताजी घटना राजस्थानात घडली आहे. गो-तस्कर असल्याच्या संशयातून जमावाने एकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. देशात जमावाकडून होणाºया हत्यांच्या वाढत्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयाने गत मंगळवारी सरकारला स्पष्ट केले होते की, अशा घटनांचा निपटारा करण्यासाठी कायदा करा.

टॅग्स :Crimeगुन्हा