शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:09 IST

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

फेसबुक फ्रेंडसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. नसरुल्ला आणि अंजूचा निकाह झाल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंजूने तिचं नाव आता बदलून फातिमा असं केलं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्याचं देखील म्हटलं जात आहे. तेव्हापासून अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेल्याचे अरविंदने सांगितले. जर ती परत आली तर तो तिला स्वीकारणार नाही. तो म्हणाला की, ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कोणालाही सांगितलं नाही. अरविंदने सांगितले की, मुलंही आईवर खूप नाराज झाली आहेत. मुलीने तर सांगितले आहे की पत्नीला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचं तोंडही पाहायचं नाही. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

अरविंदने सांगितले की, त्याचे आणि अंजूचे नाते चांगले होते. मोठं भांडण झालं नाही. प्रत्येक पती-पत्नीमध्ये काही ना काही भांडण होत असतं. तो म्हणाला की मी कुठेही गायब झालो नाही. मला मीडियापासून दूर राहायचे होते. मी थकलो आहे. माझी तब्येत बरी नाही. अरविंदला विचारले असता अंजूच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगी विक्षिप्त आहे, हट्टी आहे, तिला पाहिजे ते करते, पण लग्न करणार नाही. 

अरविंदने सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसत आहे त्यानुसार अंजूचा निकाह झाला आहे. इथेही ती खोटं बोलत होती, तिथूनही खोटं बोलत आहे. ती सर्व काही करत आहे. ती मुलांशीही बोलली, ती त्यांच्याशीही खोटे बोलत आहे. अंजूला अनेक छंद होते. भरपूर पैसे खर्च करायची. त्याच्यावर कर्जही आहे. अंजूच्या वागण्यावर अरविंद म्हणाला की, ती जे ठरवते ते ती करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान