शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:09 IST

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

फेसबुक फ्रेंडसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. नसरुल्ला आणि अंजूचा निकाह झाल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंजूने तिचं नाव आता बदलून फातिमा असं केलं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्याचं देखील म्हटलं जात आहे. तेव्हापासून अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेल्याचे अरविंदने सांगितले. जर ती परत आली तर तो तिला स्वीकारणार नाही. तो म्हणाला की, ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कोणालाही सांगितलं नाही. अरविंदने सांगितले की, मुलंही आईवर खूप नाराज झाली आहेत. मुलीने तर सांगितले आहे की पत्नीला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचं तोंडही पाहायचं नाही. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

अरविंदने सांगितले की, त्याचे आणि अंजूचे नाते चांगले होते. मोठं भांडण झालं नाही. प्रत्येक पती-पत्नीमध्ये काही ना काही भांडण होत असतं. तो म्हणाला की मी कुठेही गायब झालो नाही. मला मीडियापासून दूर राहायचे होते. मी थकलो आहे. माझी तब्येत बरी नाही. अरविंदला विचारले असता अंजूच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगी विक्षिप्त आहे, हट्टी आहे, तिला पाहिजे ते करते, पण लग्न करणार नाही. 

अरविंदने सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसत आहे त्यानुसार अंजूचा निकाह झाला आहे. इथेही ती खोटं बोलत होती, तिथूनही खोटं बोलत आहे. ती सर्व काही करत आहे. ती मुलांशीही बोलली, ती त्यांच्याशीही खोटे बोलत आहे. अंजूला अनेक छंद होते. भरपूर पैसे खर्च करायची. त्याच्यावर कर्जही आहे. अंजूच्या वागण्यावर अरविंद म्हणाला की, ती जे ठरवते ते ती करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान