शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:09 IST

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

फेसबुक फ्रेंडसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. नसरुल्ला आणि अंजूचा निकाह झाल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंजूने तिचं नाव आता बदलून फातिमा असं केलं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्याचं देखील म्हटलं जात आहे. तेव्हापासून अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेल्याचे अरविंदने सांगितले. जर ती परत आली तर तो तिला स्वीकारणार नाही. तो म्हणाला की, ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कोणालाही सांगितलं नाही. अरविंदने सांगितले की, मुलंही आईवर खूप नाराज झाली आहेत. मुलीने तर सांगितले आहे की पत्नीला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचं तोंडही पाहायचं नाही. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

अरविंदने सांगितले की, त्याचे आणि अंजूचे नाते चांगले होते. मोठं भांडण झालं नाही. प्रत्येक पती-पत्नीमध्ये काही ना काही भांडण होत असतं. तो म्हणाला की मी कुठेही गायब झालो नाही. मला मीडियापासून दूर राहायचे होते. मी थकलो आहे. माझी तब्येत बरी नाही. अरविंदला विचारले असता अंजूच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगी विक्षिप्त आहे, हट्टी आहे, तिला पाहिजे ते करते, पण लग्न करणार नाही. 

अरविंदने सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसत आहे त्यानुसार अंजूचा निकाह झाला आहे. इथेही ती खोटं बोलत होती, तिथूनही खोटं बोलत आहे. ती सर्व काही करत आहे. ती मुलांशीही बोलली, ती त्यांच्याशीही खोटे बोलत आहे. अंजूला अनेक छंद होते. भरपूर पैसे खर्च करायची. त्याच्यावर कर्जही आहे. अंजूच्या वागण्यावर अरविंद म्हणाला की, ती जे ठरवते ते ती करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान