शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 06:00 IST

‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले.

- हरिश गुप्ता/नितीन आगरवाल 

नवी दिल्ली : मतदानाच्या सहाव्या टप्प्यापर्यंत (१२ मे) शहरी भागांत झालेले मतदान पाहता, यंदा निवडणुकीत मोदी लाट होती का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने २0१४ मध्ये शहरी भागांतील या ८६ पैकी ५५ जागांवर विजय मिळविला होता आणि तिथे भरघोस मतदान झाले होते. या सर्व ८६ मतदारसंघांमध्ये नेहमीपेक्षा २0 टक्के अधिक मतदान झाल्याचे आढळून आले होते.

‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले. भरघोस मतदानाऐवजी यातील ४८ जागांवर खूपच कमी, तर ३८ ठिकाणी २0१४ इतकेच मतदान झाले. जिथे ५५ जागा जागा मिळविल्या होत्या, तिथेच त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

या ८६ पैकी ७ जागा राजधानी दिल्लीतील आहेत. त्यापैकी नवी दिल्ली मतदारसंघात मोदी व शहा यांनी सभा घेऊ नही ८.२६ टक्के कमी मतदान झाले. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मोदी यांच्या गुजरातमधील अहमदाबाद (पश्चिम), बडोदा, राजकोट, कर्नाटकातील उत्तर व मध्य बंगळुरू, झारखंडमधील धनबाद (जेथून कीर्ती आझाद काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत.), तसेच उत्तर प्रदेशातील सहारणपूर, बरेली, गाझियाबाद, झाशी, कानपूर या सर्व ठिकाणी मतदानाचे प्रमाण कमी आहे. याच ठिकाणी २00९च्या तुलनेत २0१४मध्ये प्रचंड मतदान झाले होते.

मध्य प्रदेश व राजस्थानातील शहरांमध्येही अधिक मतदान झाल्याचे दिसते. भोपाळमध्ये २00९ पेक्षा २0१४ मध्ये १३ टक्के अधिक मतदान झाले होते. यंदा तिथे ८ टक्के अधिक मतदान झाले असून, त्याचा फटका दिग्विजय सिंह यांना बसू शकतो आणि प्रज्ञा सिंह यांना फायदा मिळू शकतो, असा अर्थ लावला जात आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीचा फटकानोटाबंदी व जीएसटीची वाईट पद्धतीने अंमलबजावणी यांचा फटका शहरी भागाला बसला आणि त्यामुळे मतदान कमी झाले, असे मानले जात आहे. कमी मतदानाचे विविध अर्थ लावले जात असले, तरी त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होतो, असा यंदा लावता येणार नाही. भाजपने जिंकलेल्या ५५ पैकी २७ मतदारसंघांत गेल्या वेळपेक्षा मतदानात किरकोळ वाढ झाल्याचे दिसते. आश्चर्य म्हणजे, त्यात मुंबईतील मतदारसंघही आहेत. अन्य महानगरांत मात्र हा उत्साह दिसलेला नाही. मुंबई व दिल्ली यांतील मतदानाच्या टक्क्यात हा फरक का, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी