शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, हे खूप मोठं यश - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 21:02 IST

केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले.

केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. गुजरात येथे भाजपा नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशातील जवानांप्रती काँग्रेस संवेदनशील नसल्याचाही आरोप करताना त्यांनी ४० वर्ष One Rank-One Pension (OROP) हा प्रश्न सोडवला नाही, असेही ते म्हणाले.

 

त्यांनी सांगितले की,''आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ दिलेलं नाही. जम्मू-काश्मीर सोडाच, मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात कुठेही एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. हे खूप मोठं यश आहे. दहशतवादी भाजपा सरकारला घाबरत आहेत. ही छोटी गोष्ट नाही. दहशतवाद्यांना हे कळून चुकलंय की त्यांची आता गय केली जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून जगाला हे ठणकावून सांगितलंय की दहशतवाद्यांची खैर नाही.''

मागील ४० वर्षांपासून भारतीय जवान One Rank-One Pension (OROP) मागणी करत आहेत, परंतु काँग्रेस संवेदनशील नाहीत आणि तो मुद्दा त्यांनी सोडवला नाही, परंतु मोदीजींनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. भाजपा व काँग्रेस सरकार यांच्यातील फरक यातूनच स्पष्ट होतो, असेही सिंह यांनी सांगितले. काँग्रेस फक्त महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करतात, परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत, असाही आरोप सिंह यांनी केला.

 

अयोध्येतील राम मंदिर ही फक्त आमची घोषणाबाजी नव्हती, तर ती आमची बांधिलकी होती, असेही सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले,''आम्ही नेहमीच दिलेली वचनं पूर्ण केली आहेत. तो केवळ आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नव्हता, तर ती आमची सांस्कृतिक बांधिलकी आहे. आता राम मंदिर बांधण्यापासून कुणीच अडवू शकत नाही.''  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीterroristदहशतवादी