शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, हे खूप मोठं यश - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 21:02 IST

केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले.

केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. गुजरात येथे भाजपा नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशातील जवानांप्रती काँग्रेस संवेदनशील नसल्याचाही आरोप करताना त्यांनी ४० वर्ष One Rank-One Pension (OROP) हा प्रश्न सोडवला नाही, असेही ते म्हणाले.

 

त्यांनी सांगितले की,''आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ दिलेलं नाही. जम्मू-काश्मीर सोडाच, मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात कुठेही एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. हे खूप मोठं यश आहे. दहशतवादी भाजपा सरकारला घाबरत आहेत. ही छोटी गोष्ट नाही. दहशतवाद्यांना हे कळून चुकलंय की त्यांची आता गय केली जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून जगाला हे ठणकावून सांगितलंय की दहशतवाद्यांची खैर नाही.''

मागील ४० वर्षांपासून भारतीय जवान One Rank-One Pension (OROP) मागणी करत आहेत, परंतु काँग्रेस संवेदनशील नाहीत आणि तो मुद्दा त्यांनी सोडवला नाही, परंतु मोदीजींनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. भाजपा व काँग्रेस सरकार यांच्यातील फरक यातूनच स्पष्ट होतो, असेही सिंह यांनी सांगितले. काँग्रेस फक्त महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करतात, परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत, असाही आरोप सिंह यांनी केला.

 

अयोध्येतील राम मंदिर ही फक्त आमची घोषणाबाजी नव्हती, तर ती आमची बांधिलकी होती, असेही सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले,''आम्ही नेहमीच दिलेली वचनं पूर्ण केली आहेत. तो केवळ आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नव्हता, तर ती आमची सांस्कृतिक बांधिलकी आहे. आता राम मंदिर बांधण्यापासून कुणीच अडवू शकत नाही.''  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीterroristदहशतवादी