शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘नो लोकपाल, नो मोदी’, रामलीला दुमदुमले; अण्णांच्या प्रकृतीत बिघाड, उपोषण मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:44 IST

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.

- सुमेध बनसोड/विनोद गोळेनवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. डॉक्टरांच्या पथकाने दुपारी अण्णांची प्रकृती तपासली. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही वाढला आहे. तरीही उपोषणावर अण्णा ठाम आहेत.आजचा दिवस विशेष लक्षणीय ठरला ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजीने. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या. व्यासपीठावरून देशभक्तीपर गीते सुरू होती. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या शेतकरी नेत्यांच्या भाषणांनी आंदोलकांचा उत्साह वाढत होता. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणाºया शेतकºयांची संख्या यंदा लक्षणीय आहे.अण्णा सकाळी व्यासपीठावर आले. प्रार्थनेने दुसरा दिवस सुरू झाला. त्यानंतर ‘नो लोकपाल, नो मोदी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय जवान, जय किसान’, ‘अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू झाल्या. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा गर्दी क मी असली तरी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसत होता. मैदानात एका बाजूला जेवणाची व्यवस्था होती.पंजाब, हरयाणातून येणाºया शेतकºयांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार आज काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले.राजनाथ यांच्याशी चर्चेची शक्यताअण्णांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले असून, हजारे यांच्याबरोबर केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी बुधवारी चर्चा केली होती. कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी मोबाइलवर संभाषण झाले होते. सरकारने लेखी आश्वासन द्यावे, असे अण्णांनी सुचवले. अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.दिल्लीकरांची पाठ? अण्णा हजारेंनी २0१२ मध्ये पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनात दिल्लीकरांनी खूप गर्दी केली होती. यंदा मात्र दिल्लीकरांनी येथे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे दोन हजार आंदोलक शनिवारी उपस्थित होते. आंदोलकांची संख्या वाढेल, असा विश्वास टीम अण्णाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली