शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

‘नो लोकपाल, नो मोदी’, रामलीला दुमदुमले; अण्णांच्या प्रकृतीत बिघाड, उपोषण मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:44 IST

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.

- सुमेध बनसोड/विनोद गोळेनवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. डॉक्टरांच्या पथकाने दुपारी अण्णांची प्रकृती तपासली. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही वाढला आहे. तरीही उपोषणावर अण्णा ठाम आहेत.आजचा दिवस विशेष लक्षणीय ठरला ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजीने. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या. व्यासपीठावरून देशभक्तीपर गीते सुरू होती. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या शेतकरी नेत्यांच्या भाषणांनी आंदोलकांचा उत्साह वाढत होता. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणाºया शेतकºयांची संख्या यंदा लक्षणीय आहे.अण्णा सकाळी व्यासपीठावर आले. प्रार्थनेने दुसरा दिवस सुरू झाला. त्यानंतर ‘नो लोकपाल, नो मोदी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय जवान, जय किसान’, ‘अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू झाल्या. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा गर्दी क मी असली तरी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसत होता. मैदानात एका बाजूला जेवणाची व्यवस्था होती.पंजाब, हरयाणातून येणाºया शेतकºयांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार आज काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले.राजनाथ यांच्याशी चर्चेची शक्यताअण्णांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले असून, हजारे यांच्याबरोबर केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी बुधवारी चर्चा केली होती. कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी मोबाइलवर संभाषण झाले होते. सरकारने लेखी आश्वासन द्यावे, असे अण्णांनी सुचवले. अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.दिल्लीकरांची पाठ? अण्णा हजारेंनी २0१२ मध्ये पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनात दिल्लीकरांनी खूप गर्दी केली होती. यंदा मात्र दिल्लीकरांनी येथे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे दोन हजार आंदोलक शनिवारी उपस्थित होते. आंदोलकांची संख्या वाढेल, असा विश्वास टीम अण्णाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली