शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

‘नो लोकपाल, नो मोदी’, रामलीला दुमदुमले; अण्णांच्या प्रकृतीत बिघाड, उपोषण मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:44 IST

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.

- सुमेध बनसोड/विनोद गोळेनवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. डॉक्टरांच्या पथकाने दुपारी अण्णांची प्रकृती तपासली. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही वाढला आहे. तरीही उपोषणावर अण्णा ठाम आहेत.आजचा दिवस विशेष लक्षणीय ठरला ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजीने. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या. व्यासपीठावरून देशभक्तीपर गीते सुरू होती. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या शेतकरी नेत्यांच्या भाषणांनी आंदोलकांचा उत्साह वाढत होता. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणाºया शेतकºयांची संख्या यंदा लक्षणीय आहे.अण्णा सकाळी व्यासपीठावर आले. प्रार्थनेने दुसरा दिवस सुरू झाला. त्यानंतर ‘नो लोकपाल, नो मोदी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय जवान, जय किसान’, ‘अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू झाल्या. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा गर्दी क मी असली तरी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसत होता. मैदानात एका बाजूला जेवणाची व्यवस्था होती.पंजाब, हरयाणातून येणाºया शेतकºयांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार आज काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले.राजनाथ यांच्याशी चर्चेची शक्यताअण्णांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले असून, हजारे यांच्याबरोबर केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी बुधवारी चर्चा केली होती. कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी मोबाइलवर संभाषण झाले होते. सरकारने लेखी आश्वासन द्यावे, असे अण्णांनी सुचवले. अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.दिल्लीकरांची पाठ? अण्णा हजारेंनी २0१२ मध्ये पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनात दिल्लीकरांनी खूप गर्दी केली होती. यंदा मात्र दिल्लीकरांनी येथे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे दोन हजार आंदोलक शनिवारी उपस्थित होते. आंदोलकांची संख्या वाढेल, असा विश्वास टीम अण्णाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली