शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:21 IST

लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवर नेमके काय सुरू आहे, याची संदिग्धता केंद्र सरकारनेच वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारत- चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झालाच नसल्याचे केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे.लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत. राज्यसभेत भाजप खासदारानेच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चीनकडून यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे व भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वारंवार म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय हद्दीत चीन घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लोकसभेत स्पष्ट केले होते. आता मात्र लेखी उत्तरामुळे परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे.गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने घुसखोरीचा एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. चीनकडून मात्र घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. चीनसमवेत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर सशस्त्र जवान चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. राजनैतिक, राजकीय, चर्चा निष्फळ होताना दिसत असल्याने सीमा भागात युद्धस्थिती असल्याचे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत. मंगळवारी लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, चीनने अनेकदा घुसखोरीची प्रयत्न केला. सीमेवर अनेकदा तणाव निर्माण होतो; पण संवादाने, चर्चेने त्यावर मात करता येत. आता चीनने या भागात कुमक वाढवली आहे. १९५० पासून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.

टॅग्स :chinaचीनParliamentसंसद