शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:21 IST

लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवर नेमके काय सुरू आहे, याची संदिग्धता केंद्र सरकारनेच वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारत- चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झालाच नसल्याचे केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे.लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत. राज्यसभेत भाजप खासदारानेच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चीनकडून यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे व भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वारंवार म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय हद्दीत चीन घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लोकसभेत स्पष्ट केले होते. आता मात्र लेखी उत्तरामुळे परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे.गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने घुसखोरीचा एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. चीनकडून मात्र घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. चीनसमवेत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर सशस्त्र जवान चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. राजनैतिक, राजकीय, चर्चा निष्फळ होताना दिसत असल्याने सीमा भागात युद्धस्थिती असल्याचे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत. मंगळवारी लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, चीनने अनेकदा घुसखोरीची प्रयत्न केला. सीमेवर अनेकदा तणाव निर्माण होतो; पण संवादाने, चर्चेने त्यावर मात करता येत. आता चीनने या भागात कुमक वाढवली आहे. १९५० पासून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.

टॅग्स :chinaचीनParliamentसंसद