शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:21 IST

लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवर नेमके काय सुरू आहे, याची संदिग्धता केंद्र सरकारनेच वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारत- चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झालाच नसल्याचे केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे.लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत. राज्यसभेत भाजप खासदारानेच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चीनकडून यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे व भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वारंवार म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय हद्दीत चीन घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लोकसभेत स्पष्ट केले होते. आता मात्र लेखी उत्तरामुळे परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे.गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने घुसखोरीचा एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. चीनकडून मात्र घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. चीनसमवेत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर सशस्त्र जवान चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. राजनैतिक, राजकीय, चर्चा निष्फळ होताना दिसत असल्याने सीमा भागात युद्धस्थिती असल्याचे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत. मंगळवारी लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, चीनने अनेकदा घुसखोरीची प्रयत्न केला. सीमेवर अनेकदा तणाव निर्माण होतो; पण संवादाने, चर्चेने त्यावर मात करता येत. आता चीनने या भागात कुमक वाढवली आहे. १९५० पासून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.

टॅग्स :chinaचीनParliamentसंसद