शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:55 IST

कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्ली चाटसह फास्ट फूड जवळपास हद्दपार झाले असून, घराघरांत खमंग पदार्थांची रेलचेल आहे. याचा परिणाम वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या रेसिपी किचनमध्ये तयार होत आहेत. परिणामी, सकस आहार मिळाल्याने प्रतिकारक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.दाबेली, रगडा पॅटिस, सँडविच, पाणीपुरी, कचोरी, समोसा, पॅटिस, बर्गर, पिझ्झा या आणि असे कितीतरी ‘दिल्ली चाट’ दिल्लीकरांच्या जगण्याचा जणू महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून एकदा, एक दिवसाआड किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ‘चाट’ची चव दिल्लीकर चाखतात. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रमाण अधिक आहे. चविष्ट आणि चमचमीत असलेले हे फास्ट फूड जिभेचे चोचले पुरविणारे असले तरी ते आरोग्याला मात्र हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फास्ट फूड हे दिल्लीकरांच्या आहारातील महत्त्वाचा घटक बनले आहे. परिणामी, दिल्ली चाट हे संपूर्ण भारतातच ख्यात असून ते आता देशाच्या अन्य भागांतही उपलब्ध होऊ लागले आहे.मात्र, कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे. घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्याने फास्ट फूड दिल्लीतून जवळपास हद्दपार झाले आहे. घराघरांत असलेली कुटुंबे मात्र वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनवीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिल्ली चाट किंवा फास्ट फूडची जागा पारंपरिक आणि सकस आहाराने घेतली आहे. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून तसेच, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची घरातील किचनमध्ये रेलचेल आहे.कोरोना विषाणूच्या संकटात आपली प्रतिकारक्षमता टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. आणि याच काळात सकस आहाराच्या मेजवानीतून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत आहेत. त्यामुळे कोनोराचा मुकाबला करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत फरिदाबादमधील डॉ. राहुल रावत यांनी व्यक्त केले आहे.पोहे, उपमा, ढोकळा, इडलीची लॉकडाऊनमध्ये रेलचेल४सध्या आम्ही घरातच असलो तरी मुगाच्या डाळीची खिचडी, डाळींपासून बनविले जाणारे शेंगोळे, विविध प्रकारचे थालीपीठ, पराठे, पोहे, उपमा, शिरा, खमंग ढोकळे, इडली, डोसे यासह विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा घराघरांत घमघमाट आहे. आम्ही घरगुती मॅगी बनवून मुलांना दिली. त्यांना ती आवडली, असे आयपी एक्स्टेंशन येथे राहणाºया शिनकर कुटुंबाने सांगितले आहे.४सध्या विविध प्रकारच्या डाळींचे पदार्थ आम्ही बनवीत असल्याचे प्रीतविहार येथील लोखंडे परिवाराचे म्हणणे आहे. आईच्या हातचे अनेक पदार्थ बºयाच वर्षांनी पुन्हा खायला मिळत आहे. त्याची चव काही भन्नाटच असल्याचे मत ‘मयूर विहार’ मधील जोशी कुटुंबाने व्यक्त केले आहे.