शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:55 IST

कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्ली चाटसह फास्ट फूड जवळपास हद्दपार झाले असून, घराघरांत खमंग पदार्थांची रेलचेल आहे. याचा परिणाम वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या रेसिपी किचनमध्ये तयार होत आहेत. परिणामी, सकस आहार मिळाल्याने प्रतिकारक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.दाबेली, रगडा पॅटिस, सँडविच, पाणीपुरी, कचोरी, समोसा, पॅटिस, बर्गर, पिझ्झा या आणि असे कितीतरी ‘दिल्ली चाट’ दिल्लीकरांच्या जगण्याचा जणू महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून एकदा, एक दिवसाआड किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ‘चाट’ची चव दिल्लीकर चाखतात. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रमाण अधिक आहे. चविष्ट आणि चमचमीत असलेले हे फास्ट फूड जिभेचे चोचले पुरविणारे असले तरी ते आरोग्याला मात्र हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फास्ट फूड हे दिल्लीकरांच्या आहारातील महत्त्वाचा घटक बनले आहे. परिणामी, दिल्ली चाट हे संपूर्ण भारतातच ख्यात असून ते आता देशाच्या अन्य भागांतही उपलब्ध होऊ लागले आहे.मात्र, कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे. घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्याने फास्ट फूड दिल्लीतून जवळपास हद्दपार झाले आहे. घराघरांत असलेली कुटुंबे मात्र वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनवीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिल्ली चाट किंवा फास्ट फूडची जागा पारंपरिक आणि सकस आहाराने घेतली आहे. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून तसेच, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची घरातील किचनमध्ये रेलचेल आहे.कोरोना विषाणूच्या संकटात आपली प्रतिकारक्षमता टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. आणि याच काळात सकस आहाराच्या मेजवानीतून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत आहेत. त्यामुळे कोनोराचा मुकाबला करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत फरिदाबादमधील डॉ. राहुल रावत यांनी व्यक्त केले आहे.पोहे, उपमा, ढोकळा, इडलीची लॉकडाऊनमध्ये रेलचेल४सध्या आम्ही घरातच असलो तरी मुगाच्या डाळीची खिचडी, डाळींपासून बनविले जाणारे शेंगोळे, विविध प्रकारचे थालीपीठ, पराठे, पोहे, उपमा, शिरा, खमंग ढोकळे, इडली, डोसे यासह विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा घराघरांत घमघमाट आहे. आम्ही घरगुती मॅगी बनवून मुलांना दिली. त्यांना ती आवडली, असे आयपी एक्स्टेंशन येथे राहणाºया शिनकर कुटुंबाने सांगितले आहे.४सध्या विविध प्रकारच्या डाळींचे पदार्थ आम्ही बनवीत असल्याचे प्रीतविहार येथील लोखंडे परिवाराचे म्हणणे आहे. आईच्या हातचे अनेक पदार्थ बºयाच वर्षांनी पुन्हा खायला मिळत आहे. त्याची चव काही भन्नाटच असल्याचे मत ‘मयूर विहार’ मधील जोशी कुटुंबाने व्यक्त केले आहे.