शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:55 IST

कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्ली चाटसह फास्ट फूड जवळपास हद्दपार झाले असून, घराघरांत खमंग पदार्थांची रेलचेल आहे. याचा परिणाम वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या रेसिपी किचनमध्ये तयार होत आहेत. परिणामी, सकस आहार मिळाल्याने प्रतिकारक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.दाबेली, रगडा पॅटिस, सँडविच, पाणीपुरी, कचोरी, समोसा, पॅटिस, बर्गर, पिझ्झा या आणि असे कितीतरी ‘दिल्ली चाट’ दिल्लीकरांच्या जगण्याचा जणू महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून एकदा, एक दिवसाआड किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ‘चाट’ची चव दिल्लीकर चाखतात. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रमाण अधिक आहे. चविष्ट आणि चमचमीत असलेले हे फास्ट फूड जिभेचे चोचले पुरविणारे असले तरी ते आरोग्याला मात्र हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फास्ट फूड हे दिल्लीकरांच्या आहारातील महत्त्वाचा घटक बनले आहे. परिणामी, दिल्ली चाट हे संपूर्ण भारतातच ख्यात असून ते आता देशाच्या अन्य भागांतही उपलब्ध होऊ लागले आहे.मात्र, कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे. घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्याने फास्ट फूड दिल्लीतून जवळपास हद्दपार झाले आहे. घराघरांत असलेली कुटुंबे मात्र वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनवीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिल्ली चाट किंवा फास्ट फूडची जागा पारंपरिक आणि सकस आहाराने घेतली आहे. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून तसेच, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची घरातील किचनमध्ये रेलचेल आहे.कोरोना विषाणूच्या संकटात आपली प्रतिकारक्षमता टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. आणि याच काळात सकस आहाराच्या मेजवानीतून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत आहेत. त्यामुळे कोनोराचा मुकाबला करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत फरिदाबादमधील डॉ. राहुल रावत यांनी व्यक्त केले आहे.पोहे, उपमा, ढोकळा, इडलीची लॉकडाऊनमध्ये रेलचेल४सध्या आम्ही घरातच असलो तरी मुगाच्या डाळीची खिचडी, डाळींपासून बनविले जाणारे शेंगोळे, विविध प्रकारचे थालीपीठ, पराठे, पोहे, उपमा, शिरा, खमंग ढोकळे, इडली, डोसे यासह विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा घराघरांत घमघमाट आहे. आम्ही घरगुती मॅगी बनवून मुलांना दिली. त्यांना ती आवडली, असे आयपी एक्स्टेंशन येथे राहणाºया शिनकर कुटुंबाने सांगितले आहे.४सध्या विविध प्रकारच्या डाळींचे पदार्थ आम्ही बनवीत असल्याचे प्रीतविहार येथील लोखंडे परिवाराचे म्हणणे आहे. आईच्या हातचे अनेक पदार्थ बºयाच वर्षांनी पुन्हा खायला मिळत आहे. त्याची चव काही भन्नाटच असल्याचे मत ‘मयूर विहार’ मधील जोशी कुटुंबाने व्यक्त केले आहे.