शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

मोदी सरकारच्या घोषणांवर विश्वास नाही; शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार - टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 11:08 IST

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इको गार्डनमध्ये सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राकेश टिकैत म्हणाले की, तीन कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही. 

लखनऊ : तीन नवे कृषी कायदे रद्द होणे हाच आमचा एकमेव मुद्दा नव्हता. किमान हमीभावासारखे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोवर आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला आहे. नवे कृषी कायदे संसदेत रद्द करून त्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांचा अजिबात विश्वास बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इको गार्डनमध्ये सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राकेश टिकैत म्हणाले की, तीन कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही. किमान हमी भावासाठी कायदा करा, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक करा, आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरील खटले रद्द करा, शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्यांचे स्मारक उभारण्यात यावे, विजेसंदर्भातील दुरुस्ती कायदा रद्द करा आदी सहा मागण्या संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केल्या होत्या.

केंद्राने शरणागती पत्करल्याचा दावातीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील लढाईत शेतकऱ्यांनी नव्हेतर, केंद्र सरकारने सपशेल शरणागती पत्करली आहे, असा दावा भारतीय किसान युनियनचे नेेते राकेश टिकैत यांनी किसान महापंचायतीतील भाषणात केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन