शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

CoronaVirus News: ...तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 12:05 IST

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असताना WHOचं चिंता वाढवणारं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे.  कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) स्पष्टीकरणामुळे चिंतेत भर पडली आहे.स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावीकोरोना रुग्णांच्या उपचारात रेमडेसिविर प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. देशात रेमडेसिविरची मागणी वाढत असताना, त्यासाठी काळाबाजार होत असताना डब्ल्यूएचओकडून आलेलं स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर डब्ल्यूएचओनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर उपयोगी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे.बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनकडब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि कोविड तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉय मारिया वेन केरखोव यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले. 'रेमडेसिविर इंजेक्शनच्या पाच चाचण्या झाल्या आहेत. मात्र त्यातून ना कोरोना रुग्ण बरे झाल्याचं निष्पन्न झालंय ना मृतांचा आकडा कमी झाल्यानं दिसून आलंय. सध्या आम्ही एका मोठ्या चाचणीची वाट पाहात आहोत. त्या चाचणीच्या अहवालातून रेमडेसिविरच्या परिणामकारकतेवर स्पष्टपणे भाष्य करता येईल,' असं स्वामीनाथन आणि केरखोव यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या