शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'बुलडोझर एक्शन'वर सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; "जरी एखादा दोषी असेल तरीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:35 IST

जमियत उलेमा ए हिंद यांच्याकडून कोर्टात याचिका दाखल करत दोषींच्या घरावर मनमर्जीप्रमाणे बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला मनाई करा अशी मागणी केली होती

नवी दिल्ली - केवळ दोषी असल्याच्या आधारे कुणाचंही घर पाडणे योग्य नाही. जर कुणी दोषी असेल तर त्याचे घर पाडले जाऊ शकत नाही असं सांगत सुप्रीम कोर्टाने बुलडोझर कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी कोर्टाचे आदेश मान्य केले. त्याशिवाय बुलडोझर कारवाई अवैध बांधकाम बांधल्याप्रकरणी केली आहे. आरोपी दोषी आहेत त्यामुळे नसल्याचे मेहता यांनी कोर्टात बाजू मांडली. 

बुलडोझर कारवाई प्रकरणी सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी सुरू झाली. त्यात न्या. गवई, न्या. के.वी.विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर महाधिकावक्ता तुषार मेहता यांनी त्यांचा युक्तिवाद केला. जी काही कारवाई केली ती महापालिका कायद्याद्वारे केली. अवैध बांधकामांना महापालिकेकडून नोटीस दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यावर न्या. विश्वनाथन यांनी सरकारकडून सविस्तर उत्तर मागवलं. कोर्टाने नोटीस, कारवाई आणि अन्य आरोपांवर म्हणणं मांडण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. 

जमियत उलेमा ए हिंद यांनी केली होती याचिका

जमियत उलेमा ए हिंद यांच्याकडून कोर्टात याचिका दाखल करत दोषींच्या घरावर मनमर्जीप्रमाणे बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला मनाई करा अशी मागणी केली होती. याचिका यूपी, मध्य प्रदेश, राजस्थानात बुलडोझर कारवाईचा उल्लेख करत अल्पसंख्याकांना टार्गेट केले जात आहे असाही आरोप केला होता. वकील फारुख रशीद यांच्याकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी होती. 

प्रियंका गांधींनी केली होती टीका

अलीकडेच मध्य प्रदेशातील छतरपूर हिंसाचारानंतर प्रशासनाने मुख्य आरोपी शेहजाद अलीच्या १० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवला होता. या बुलडोझर कारवाईवर काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई अस्वीकार्य असल्याचे म्हटलं. अशा प्रकारची कारवाई थांबविण्याची मागणीही प्रियांका गांधी यांनी केली होती. "एखाद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असल्यास, केवळ न्यायालयच त्याचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ठरवू शकते. पण आरोप होताच आरोपीच्या कुटुंबीयांना शिक्षा करणे, डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायदा न पाळणे, न्यायालयाचा अवमान करणे, आरोप होताच आरोपीचे घर पाडणे. हा सगळा न्याय नाही. ही रानटीपणाची आणि अन्यायाची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं होते.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय