शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:20 IST

India Vs US Tariff: भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबत भारताच्या एका सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफचा भारतावर काही खास प्रभाव पडणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारत शेतकरी, डेअरी आणि एमएसएमईबाबत कुठलीही तडजोड केली जाण्याची शक्यता नाही आहे. तसेच संशोधित पिकांच्या आयातीलाही परवानही दिली जाण्याचीही कुठलीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफच्या प्रभावाची जाणीव असलेल्या या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्याहून भारतासाठी अन्य काहीही महत्त्वाचं नाही आहे. भारत अमेरिकेसाठी शेती, डेअरी आणि एमएसएईबाबत कुठलीही तडजोड करणार नाही.

स्पष्टच शब्दात सांगायचं तर अमेरिका ज्या विभागांवरील टॅरिफ कमी करण्यासाठी भारतावर वारंवार टॅरिफ आणि अन्य निर्बंधांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या विभागातील बाजार कुणासाठी खुला करण्यास भारत राजी नाही आहे. अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की, २५ टॅरिफचा प्रभाव किरकोळ आहे. तसेच तो भारतीय बाजारांसाठी अजिबात चिंताजनक नाही आहे.

भारतीय बाजार आपल्या उत्पादनांसाठी खुला व्हावा यासाठी डेअरी प्रॉडक्टवरील टॅरिफ कमी करावा, असा आग्रह अमेरिकेने भारताकडे धरला आहे. मात्र भारत यासाठी अजिबात तयार नाही आहे. त्यामुळे हा टॅरिफ कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत आहे.

भारत कृषी क्षेत्र आणि डेअरी क्षेत्रांना आपली प्रमुख क्षेत्रे मानतो. त्यामुळे याबाबत काही तडजोड केली तर भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती भारताला आहे. त्यामुळेच भारत देशांतर्गत उत्पादनांची मागणी कायम राहावी आणि परदेशी वस्तूंनी बाजारपेठ काबीज करू नये यासाठी दुसऱ्या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या कृषी आणि डेअर उत्पादनांवर अधिक टॅरिफ आकारतो.

दरम्यान, अमेरिकेने बुधवारी भारतावर २५ टक्क टॅरिफ आकारलं होतं. हे टॅरिफ आजपासून लागू होणार होतं. मात्र आता ही डेडलाईन पुढे वाढवण्यात आली आहे. आता हे टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाAgriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय