शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:20 IST

India Vs US Tariff: भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबत भारताच्या एका सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफचा भारतावर काही खास प्रभाव पडणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारत शेतकरी, डेअरी आणि एमएसएमईबाबत कुठलीही तडजोड केली जाण्याची शक्यता नाही आहे. तसेच संशोधित पिकांच्या आयातीलाही परवानही दिली जाण्याचीही कुठलीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफच्या प्रभावाची जाणीव असलेल्या या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्याहून भारतासाठी अन्य काहीही महत्त्वाचं नाही आहे. भारत अमेरिकेसाठी शेती, डेअरी आणि एमएसएईबाबत कुठलीही तडजोड करणार नाही.

स्पष्टच शब्दात सांगायचं तर अमेरिका ज्या विभागांवरील टॅरिफ कमी करण्यासाठी भारतावर वारंवार टॅरिफ आणि अन्य निर्बंधांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या विभागातील बाजार कुणासाठी खुला करण्यास भारत राजी नाही आहे. अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की, २५ टॅरिफचा प्रभाव किरकोळ आहे. तसेच तो भारतीय बाजारांसाठी अजिबात चिंताजनक नाही आहे.

भारतीय बाजार आपल्या उत्पादनांसाठी खुला व्हावा यासाठी डेअरी प्रॉडक्टवरील टॅरिफ कमी करावा, असा आग्रह अमेरिकेने भारताकडे धरला आहे. मात्र भारत यासाठी अजिबात तयार नाही आहे. त्यामुळे हा टॅरिफ कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत आहे.

भारत कृषी क्षेत्र आणि डेअरी क्षेत्रांना आपली प्रमुख क्षेत्रे मानतो. त्यामुळे याबाबत काही तडजोड केली तर भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती भारताला आहे. त्यामुळेच भारत देशांतर्गत उत्पादनांची मागणी कायम राहावी आणि परदेशी वस्तूंनी बाजारपेठ काबीज करू नये यासाठी दुसऱ्या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या कृषी आणि डेअर उत्पादनांवर अधिक टॅरिफ आकारतो.

दरम्यान, अमेरिकेने बुधवारी भारतावर २५ टक्क टॅरिफ आकारलं होतं. हे टॅरिफ आजपासून लागू होणार होतं. मात्र आता ही डेडलाईन पुढे वाढवण्यात आली आहे. आता हे टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाAgriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय