शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:20 IST

India Vs US Tariff: भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम आणि रखडलेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यातड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबत भारताच्या एका सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफचा भारतावर काही खास प्रभाव पडणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारत शेतकरी, डेअरी आणि एमएसएमईबाबत कुठलीही तडजोड केली जाण्याची शक्यता नाही आहे. तसेच संशोधित पिकांच्या आयातीलाही परवानही दिली जाण्याचीही कुठलीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफच्या प्रभावाची जाणीव असलेल्या या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्याहून भारतासाठी अन्य काहीही महत्त्वाचं नाही आहे. भारत अमेरिकेसाठी शेती, डेअरी आणि एमएसएईबाबत कुठलीही तडजोड करणार नाही.

स्पष्टच शब्दात सांगायचं तर अमेरिका ज्या विभागांवरील टॅरिफ कमी करण्यासाठी भारतावर वारंवार टॅरिफ आणि अन्य निर्बंधांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या विभागातील बाजार कुणासाठी खुला करण्यास भारत राजी नाही आहे. अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की, २५ टॅरिफचा प्रभाव किरकोळ आहे. तसेच तो भारतीय बाजारांसाठी अजिबात चिंताजनक नाही आहे.

भारतीय बाजार आपल्या उत्पादनांसाठी खुला व्हावा यासाठी डेअरी प्रॉडक्टवरील टॅरिफ कमी करावा, असा आग्रह अमेरिकेने भारताकडे धरला आहे. मात्र भारत यासाठी अजिबात तयार नाही आहे. त्यामुळे हा टॅरिफ कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत आहे.

भारत कृषी क्षेत्र आणि डेअरी क्षेत्रांना आपली प्रमुख क्षेत्रे मानतो. त्यामुळे याबाबत काही तडजोड केली तर भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती भारताला आहे. त्यामुळेच भारत देशांतर्गत उत्पादनांची मागणी कायम राहावी आणि परदेशी वस्तूंनी बाजारपेठ काबीज करू नये यासाठी दुसऱ्या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या कृषी आणि डेअर उत्पादनांवर अधिक टॅरिफ आकारतो.

दरम्यान, अमेरिकेने बुधवारी भारतावर २५ टक्क टॅरिफ आकारलं होतं. हे टॅरिफ आजपासून लागू होणार होतं. मात्र आता ही डेडलाईन पुढे वाढवण्यात आली आहे. आता हे टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाAgriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय