शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना मृत घोषित करण्याचे पाप करणार नाही, मोसूलमधील भारतीयांबाबत सुषमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 16:13 IST

इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले.

नवी दिल्ली, दि. 26 - इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले. जर त्यांच्याविषयी माहिती नाही तर त्यांना मृत घोषित का करण्यात येत नाही असा सवाल मला विचारण्यात येतोय. मात्र पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे हे पाप आहे आणि ते पाप मी कधीही करणार नाही, असेही सुषमा यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहराची नुकतीच मुक्तता करण्यात आली आहे. येथूनच तीन वर्षांपूर्वी 40 भारतीयांचे अपहरण झाले होते. त्यातील एका अपहृताने स्वत:ची सुटका करून घेतल्यावर ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, तीन वर्षे लोटल्यानंतरही या भारतीयांबाबत पुरेशी माहिती सरकारला मिळालेली नाही. याबाबत संसदेत माहिती देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, मोसूलमधील 39 भारतीयांबाबत मी ते जिवंत आहेत किंवा मृत याबाबत कधीही वक्तव्य केलेले नाही.  प्रत्येक वेळी सभागृहाला विश्वासात घेत मी पुढे पाऊल टाकले."  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज विरोधी पक्षांची दिशाभूल करत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. मोसूलमधील भारतीयांप्रकरणी मी दिशाभूल करत असल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. पण मी खरोखरच दिशाभूल करतेय का?  मी कधी सांगितले की ते जिवंत आहेत? मग मी त्यांना मृत घोषित का करत नाही, असा सवाल विचारला जात आहे. पण पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे पाप आहे. ते पाप मी कधीही करणार नाही. "या प्रकरणात केवळ एक व्यक्ती सांगतेय की त्यांची हत्या झाली. तर आमची सहा सूत्रे सांगतात की त्यांना मारण्यात आले नाही. मग तुम्हीच सांगा मी काय केले पाहिजे. तसेच संबंधितांपर्यंत माझा थेट संपर्क झालेला नाही. त्यांच्या जिवंत असल्याचाही काही  पुरावा नाही. जेव्हा त्यांच्याबाबत काही सबळ पुरावा मिळेल तेव्हा मी सभागृहात येऊन माहिती देईन," असे सुषमा यांनी सांगितले.