शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
3
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
4
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
5
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
6
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
7
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
8
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
9
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
10
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
11
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
12
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
13
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
14
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
15
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
16
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
17
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
18
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
19
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
20
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा प्रकरणात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत अटक नाही - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 10:38 IST

हुंडाविरोधी कायद्याचा आपल्या पती आणि सासू-सास-यांविरोधात महिलांकडून होणा-या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाने काळजी व्यक्त केली आहे

ठळक मुद्दे हुंडा प्रकरणांमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तसंच त्यातील तथ्य समोर येत नाही तोपर्यंत कोणताही अटक किंवा कारवाई करु नये कायद्याचा आधार घेत महिला पतीच्या नातेवाईकांना फौजजारी खटल्यांमध्ये अडकवत आहेतहुंडा छळ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कुटुंब कल्याण समिती गठीत करण्याचा आदेशयाआधीही न्यायालयाने 3 जुलै 2014 रोजी एक महत्वाचा निर्णय देताना हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं

नवी दिल्ली, दि. 28 - हुंडाविरोधी कायद्याचा आपल्या पती आणि सासू-सास-यांविरोधात महिलांकडून होणा-या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाने काळजी व्यक्त केली आहे. सोबतच हुंडा प्रकरणांमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तसंच त्यातील तथ्य समोर येत नाही तोपर्यंत कोणताही अटक किंवा कारवाई करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. 

महिलांमध्ये आयपीसी 498A च्या गैरवापराचा ट्रेंड वाढत आहे. कायद्याचा आधार घेत महिला पतीचे नातेवाईक ज्यामध्ये पालक, लहान मुलं आणि वयस्करांचा सहभाग असतो त्यांना फौजदारी खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांकडे लक्ष देण्याची वेळ आली असल्याचं न्यायाधीश ए के गोईल आणि यू यू ललित यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हुंडा छळ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कुटुंब कल्याण समिती गठीत करण्यास सांगितलं आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात यावी, त्याआधी नाही असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून कायदेशीर सेवा प्राधिकरणाला प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समिती गठीत करण्यास सांगितलं आहे. या समितीमध्ये तीन सदस्य असतील ज्यांच्या कामकाजावर जिल्हा न्यायाधीश सतत लक्ष ठेवून असतील. समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ता, कायदेशीर स्वयंसेवक आणि निवृत्त व्यक्तीचा समावेश असेल. 

सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शकतत्त्वेही जारी केली आहेत. खंडपीठाने सांगितलं आहे की, जर एखादी महिला जखमी झाली असेल किंवा छळ केल्याने मृत्यू झाला असेल, तर प्रकरण पुर्णपणे वेगळं असेल आणि या परिघात ते समाविष्ट होणार नाही. अशा प्रकरणांमध्ये अटकेची कारवाई करण्यावर कोणतेच बंधन नाही. हुंडा प्रकरणांमध्ये समजुतीने प्रकरण सोडवलं गेलं पाहिजे असंही न्यायालयाने सांगितलं आहे. 

याआधीही न्यायालयाने 3 जुलै 2014 रोजी एक महत्वाचा निर्णय देताना हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं नमूद केलं होतं. यावेळी फक्त गरज पडल्यास आरोपीला अटक करा असा आदेशही पोलिसांना देण्यात आला होता. 

ज्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते तिथे फक्त गुन्हा केला असेल अशी शक्यता असल्याचा आधारे अटकेची कारवाई करण्यात येऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. जेव्हा सबळ पुरावे उपलब्ध असतील, तसंच आरोपी बाहेर राहिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो अशी शंका असेल तेव्हाच अटकेची कारवाई करा असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हुंडा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होणा-या अटकेंवरही चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणांमध्ये अनेकदा आरोपींची मुक्तता होता, तर शिक्षा दर फक्त 15 टक्के आहे.