शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:06 IST

शांतता कालावधी : तक्रार/एफआयआर दाखल केल्यापासून पुढील २ महिन्यांपर्यंत अटक करता येणार नाही. 

डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराला शिक्षा देणारे भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ (भारतीय नागरी संहिता कलम ८५) चा गैरवापर रोखण्यासाठी २ महिने अटक न करण्याच्या व कौटुंबिक कल्याण समित्या स्थापन करण्याच्या २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे.शिवांगी बंसल आणि साहिब बंसल यांचा विवाह २०१५ मध्ये झाला.  पुढे दोघात वाद झाले. शिवांगी ही उत्तर प्रदेश केडरची आयपीएस असून तिने पती, सासरच्या लोकांविरोधात  ४९८ अ (गृहक्रौर्य), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३७६ (बलात्कार) आणि ४०६ (विश्वासघात) सारखे  ६ गंभीर गुन्हे दाखल केले. यामुळे पती १०९ दिवस आणि सासरे १०३ दिवस तुरुंगात होते. साहिब बंसलनेही पत्नीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या.

प्रामाणिक पोलिस अधिकारीच करतील चौकशी > शांतता कालावधी : तक्रार/एफआयआर दाखल केल्यापासून पुढील २ महिन्यांपर्यंत अटक करता येणार नाही. > ४९८ अ सोबत १० वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेली कलमे असतील तर हे लागू होईल. > जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत प्रत्येक कौटुंबिक कल्याण समित्या असतील. > यात तरुण वकील, अंतिम वर्षातील विधी महाविद्यालयाचे  विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिक्षित पत्नींचा समावेश. > समितीचा अहवाल येईपर्यंत पोलिस अटक करणार नाहीत. मात्र, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब घेणे यासारखी प्राथमिक चौकशी सुरू राहू शकते.> पती-पत्नी आणि त्यांच्या वडीलधाऱ्यांशी संवाद साधून समिती दोन महिन्यांत तपशीलवार अहवाल न्यायालयाला देईल.> समिती सदस्य मानधनाशिवाय किंवा नाममात्र मानधनावर काम करतील.> विधी सेवा प्राधिकरण वेळोवेळी समिती सदस्यांना प्रशिक्षण देईल.  > विशेष प्रशिक्षण घेतलेले प्रामाणिक पोलिस अधिकारीच यात चौकशी करतील.   

पतीला दिला दिलासाया प्रकरणावर निर्णय देताना, अलाहाबाद हायकोर्टाने कलम ४९८ अ चा गैरवापर टाळण्यासाठी कौटुंबिक कल्याण समित्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सुप्रीम कोर्टाने याला संमती देत या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी संबंधित प्राधिकरणांनी करावी, असे म्हटले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने हा विवाह समाप्त केला. सर्व गुन्हेगारी कारवाया रद्द केल्या व पत्नीसह तिच्या पालकांना पतीची  सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश देत पदाचा गैरवापर करू नका, असे सुनावले.

टॅग्स :Courtन्यायालयDomestic Violenceघरगुती हिंसा