शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:06 IST

शांतता कालावधी : तक्रार/एफआयआर दाखल केल्यापासून पुढील २ महिन्यांपर्यंत अटक करता येणार नाही. 

डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराला शिक्षा देणारे भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ (भारतीय नागरी संहिता कलम ८५) चा गैरवापर रोखण्यासाठी २ महिने अटक न करण्याच्या व कौटुंबिक कल्याण समित्या स्थापन करण्याच्या २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे.शिवांगी बंसल आणि साहिब बंसल यांचा विवाह २०१५ मध्ये झाला.  पुढे दोघात वाद झाले. शिवांगी ही उत्तर प्रदेश केडरची आयपीएस असून तिने पती, सासरच्या लोकांविरोधात  ४९८ अ (गृहक्रौर्य), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३७६ (बलात्कार) आणि ४०६ (विश्वासघात) सारखे  ६ गंभीर गुन्हे दाखल केले. यामुळे पती १०९ दिवस आणि सासरे १०३ दिवस तुरुंगात होते. साहिब बंसलनेही पत्नीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या.

प्रामाणिक पोलिस अधिकारीच करतील चौकशी > शांतता कालावधी : तक्रार/एफआयआर दाखल केल्यापासून पुढील २ महिन्यांपर्यंत अटक करता येणार नाही. > ४९८ अ सोबत १० वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेली कलमे असतील तर हे लागू होईल. > जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत प्रत्येक कौटुंबिक कल्याण समित्या असतील. > यात तरुण वकील, अंतिम वर्षातील विधी महाविद्यालयाचे  विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिक्षित पत्नींचा समावेश. > समितीचा अहवाल येईपर्यंत पोलिस अटक करणार नाहीत. मात्र, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब घेणे यासारखी प्राथमिक चौकशी सुरू राहू शकते.> पती-पत्नी आणि त्यांच्या वडीलधाऱ्यांशी संवाद साधून समिती दोन महिन्यांत तपशीलवार अहवाल न्यायालयाला देईल.> समिती सदस्य मानधनाशिवाय किंवा नाममात्र मानधनावर काम करतील.> विधी सेवा प्राधिकरण वेळोवेळी समिती सदस्यांना प्रशिक्षण देईल.  > विशेष प्रशिक्षण घेतलेले प्रामाणिक पोलिस अधिकारीच यात चौकशी करतील.   

पतीला दिला दिलासाया प्रकरणावर निर्णय देताना, अलाहाबाद हायकोर्टाने कलम ४९८ अ चा गैरवापर टाळण्यासाठी कौटुंबिक कल्याण समित्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सुप्रीम कोर्टाने याला संमती देत या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी संबंधित प्राधिकरणांनी करावी, असे म्हटले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने हा विवाह समाप्त केला. सर्व गुन्हेगारी कारवाया रद्द केल्या व पत्नीसह तिच्या पालकांना पतीची  सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश देत पदाचा गैरवापर करू नका, असे सुनावले.

टॅग्स :Courtन्यायालयDomestic Violenceघरगुती हिंसा