शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:32 IST

Nitish Kumar News: मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते.

मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ आधी नितीश कुमार हे  इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ते पुढच्या काळात काय भूमिका घेतील, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. तसेच नितीश कुमार हे पुन्हा एकदा आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये प्रवेश करणार का? याबाबतही विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचं एक विधान चर्चेत आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विधानामधून त्यांची आरजेडीसोबत जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा जनता दल युनायटेड पक्ष आरजेडीसोबत आघाडी करणार नाही. आम्ही दोन वेळा आरजेडीसोबत आघाडी केली होती. मात्र आता कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही.  

दरम्यान, नितीश कुमार यांना २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करत भाजपासोबतची आघाडी तोडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी भाजपासोबत पुन्हा एकदा मैत्री केली होती. मात्र दीड वर्षांनंतर त्यांचं पुन्हा एकदा भाजपासोबत बिनसलं आणि  ते आरजेडीसोबत आघाडीत गेले. पण पुन्हा एकदा यावर्षाच्या सुरुवातीला दोघांचीही आघाडी तुटली होती. तसेच नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाचं बहुमत हुकल्याने नितीश कुमार यांची केंद्रातील भूमिका महत्त्वाची  बनली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल