शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

नितीश कुमार घेणार नवव्यांदा शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:23 IST

Nitish Kumar News: महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

इ.स. २००० मध्ये नितीशकुमार भाजपला सोबत घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. मात्र बहुमताअभावी त्यांना ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते १४ वर्षे भाजपसोबत राहिले. २०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले.

२०१५ मध्ये ते महागठबंधनमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला. २०२०ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधनसोबत गेले. जदयुला वगळल्यास महागठबंधनकडे ११४ आमदार आहेत. बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना फक्त ८ आमदार कमी पडतात. ‘हम’चे ४ आमदार आल्यास आणखी ४ आमदारांचीच गरज महागंठबनला भासेल. रालोआचे संख्याबळ १२७ आहे. 

लालूंना सर्वाधिकारराष्ट्रीय जनता दलाची (राजद) एक बैठक शनिवारी झाली. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीतील निर्णयांची माहिती पक्ष प्रवक्ते मनोज झा यांनी नंतर पत्रकारांना दिली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, मी नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले आहे.

शपथविधीला अमित शाह येणारप्राप्त माहितीनुसार, नितीशकुमार हे रविवारी सकाळी ११.०० वा. राजभवनावर नव्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. नव्या सरकारमध्ये २ उपमुख्यमंत्री असतील.

खरगे यांच्याशी बोलणे टाळलेबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन घेण्याचे टाळले. त्यांची मनधरणी करण्यासाठी खरगे यांनी फोन केला होता, असे समजते. मागील २४ तासांपासून लालूप्रसाद यादव हे नितीशकुमार यांना फोन करण्याचा प्रयत्न करीत होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार