शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नितीश कुमार घेणार नवव्यांदा शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:23 IST

Nitish Kumar News: महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

इ.स. २००० मध्ये नितीशकुमार भाजपला सोबत घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. मात्र बहुमताअभावी त्यांना ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते १४ वर्षे भाजपसोबत राहिले. २०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले.

२०१५ मध्ये ते महागठबंधनमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला. २०२०ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधनसोबत गेले. जदयुला वगळल्यास महागठबंधनकडे ११४ आमदार आहेत. बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना फक्त ८ आमदार कमी पडतात. ‘हम’चे ४ आमदार आल्यास आणखी ४ आमदारांचीच गरज महागंठबनला भासेल. रालोआचे संख्याबळ १२७ आहे. 

लालूंना सर्वाधिकारराष्ट्रीय जनता दलाची (राजद) एक बैठक शनिवारी झाली. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीतील निर्णयांची माहिती पक्ष प्रवक्ते मनोज झा यांनी नंतर पत्रकारांना दिली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, मी नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले आहे.

शपथविधीला अमित शाह येणारप्राप्त माहितीनुसार, नितीशकुमार हे रविवारी सकाळी ११.०० वा. राजभवनावर नव्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. नव्या सरकारमध्ये २ उपमुख्यमंत्री असतील.

खरगे यांच्याशी बोलणे टाळलेबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन घेण्याचे टाळले. त्यांची मनधरणी करण्यासाठी खरगे यांनी फोन केला होता, असे समजते. मागील २४ तासांपासून लालूप्रसाद यादव हे नितीशकुमार यांना फोन करण्याचा प्रयत्न करीत होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार