शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Nitish Kumar Prashant Kishor: "नितीश कुमार खुर्चीला फेविकॉल लावूनच बसलेत.."; प्रशांत किशोर यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 21:34 IST

"तरच मी नितीश कुमारांना 'खरा नेता' म्हणून स्वीकारेन"

Nitish Kumar Prashant Kishor: महाराष्ट्रात जरी भाजपाला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या साथीने सत्ता स्थापना करण्यात यश आले असले तरी बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधनचे सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांनी भाजपा दिलेल्या धक्का चांगलाच चर्चेत आहे. राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची चकमकही तीव्र झाली आहे. भाजपा सोबतच आता निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांनीही बिहारच्या नव्या सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या २० लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच, नितीश कुमार खु्र्चीला फेविकॉल लावून चिकटून बसले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

नितीश कुमार हे 'फेविकॉल' लावून खुर्चीवर चिकटून बसले आहेत. मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्याकडून सुटतच नाही. इतर पक्ष कधी इकडे तर कधी तिकडे फिरत बसतात पण नितीश कुमार मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अगदी फेविकॉलसारखे चिकटले आहेत. जनतेने या सरकारला मतदान केले नाही. हे सरकार 'जुगाड'वर चालत आहे. त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा अजिबातच विश्वास नाही. २००५ ते २०१० या काळात NDA सरकारने चांगले काम केले होते. पण त्यानंतर आता नितीश कुमार मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला फेविकॉलसारखे चिकटून बसले आहेत", अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

नितीश कुमार यांनी महागठबंधन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बिहारमधील तरुणांना २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बिहारमध्ये किमान १० लाख सरकारी नोकऱ्या आणि आणखी १० लाख 'रोजगाराच्या संधी' निर्माण होतील, असे नितीश कुमार म्हणाले होते. नितीश यांच्या नोकरीच्या आश्वासनाची खिल्ली उडवत प्रशांत किशोर म्हणाले की सरकारने येत्या दोन ते तीन वर्षांत ५ ते १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास मी आता सुरू केलेले 'जन सूरज अभियान' बंद करेन आणि मी त्यांचा नेता म्हणून स्वीकार करेन.

जन सूरज अभियानांतर्गत समस्तीपूरमध्ये पोहोचलेल्या प्रशांत किशोर यांनी बुधवारी महागठबंधन सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, शाळांमध्ये शिकवणाऱ्या नोकरदार शिक्षकांना सरकार वेळेवर पगार देऊ शकत नाही आणि त्यांना नवीन नोकऱ्या कुठून देणार. आगामी काळात आणखी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार