शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:11 IST

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.

Nitish Kumar ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हेच नितीश कुमार आता वेगळ्या विचारात असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून घोषित करावं, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडून केली जात होती. मात्र पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात असून ते इंडिया आघाडीपासून वेगळं होण्याचीही भूमिका घेऊ शकतात.

नितीश कुमार हे अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात सतत बदललेल्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला सोबत घेत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.

२९ तारीख ठरणार महत्त्वाची!

नितीश कुमार यांच्या आगामी डावपेचांच्या दृष्टीने २९ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कारण २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. कारण ललन सिंह यांच्या पुढाकारानेच मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याने ललन सिंह हे काहीसे नाराज झाले असून ते अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहार