शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:11 IST

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.

Nitish Kumar ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हेच नितीश कुमार आता वेगळ्या विचारात असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून घोषित करावं, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडून केली जात होती. मात्र पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात असून ते इंडिया आघाडीपासून वेगळं होण्याचीही भूमिका घेऊ शकतात.

नितीश कुमार हे अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात सतत बदललेल्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला सोबत घेत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.

२९ तारीख ठरणार महत्त्वाची!

नितीश कुमार यांच्या आगामी डावपेचांच्या दृष्टीने २९ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कारण २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. कारण ललन सिंह यांच्या पुढाकारानेच मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याने ललन सिंह हे काहीसे नाराज झाले असून ते अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहार