शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:11 IST

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.

Nitish Kumar ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हेच नितीश कुमार आता वेगळ्या विचारात असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून घोषित करावं, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडून केली जात होती. मात्र पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात असून ते इंडिया आघाडीपासून वेगळं होण्याचीही भूमिका घेऊ शकतात.

नितीश कुमार हे अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात सतत बदललेल्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला सोबत घेत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.

२९ तारीख ठरणार महत्त्वाची!

नितीश कुमार यांच्या आगामी डावपेचांच्या दृष्टीने २९ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कारण २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. कारण ललन सिंह यांच्या पुढाकारानेच मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याने ललन सिंह हे काहीसे नाराज झाले असून ते अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहार