शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

नितीशकुमार पाचव्यांदा सत्तारूढ

By admin | Updated: November 21, 2015 04:32 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि प्रथमच आमदार झालेले तेजस्वी यादव हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात झालेल्या या शपथविधी समारंभात नितीशकुमार यांच्याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची दोन मुले तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यासह महाआघाडीच्या २८ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात राजद आणि जदयूचे प्रत्येकी १२, तर काँग्रेसच्या ४ मंत्र्यांचा समावेश आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. शपथविधी समारंभात सर्वांच्या नजरा लालूपुत्रांवर खिळलेल्या होत्या. तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर शपथ घेतली.भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शननितीशकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा शपथविधी समारंभ म्हणजे शिवसेना, शिरोमणी अकाली दल हे भाजपप्रणीत रालोआतील घटक पक्ष तसेच भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शन करणारा ठरला, असे मानले जात आहे. कार्यक्रमाला शिअदच्या वतीने पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल आणि शिवसेनेतर्फे महाराष्ट्राचे मंत्रिद्वय रामदास कदम व सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग, केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा समावेश होता.तांत्रिक कारणामुळे राहुल गांधींना विलंबराहुल गांधी यांना दिल्लीहून पोहोचण्यास विलंब झाल्याने कार्यक्रम संपण्याच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वी ते समारंभस्थळी पोहोचले. गांधी यांना घेऊन येणाऱ्या विमानाने काही तांत्रिक कारणांमुळे तासभर उशिरा उड्डाण केले. राहुल यांनी स्वत: टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ते व्यासपीठावर पोहोचले तेव्हा २३ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. राहुल यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी हे पाचव्या क्रमांकावर शपथ घेणार होते; परंतु वेळेत न पोहोचल्याने त्यांना सर्वात शेवटी २८ व्या स्थानावर शपथ घ्यावी लागली.लालूपुत्राने केली चूकलालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना चूक केल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. त्यांनी ‘अपेक्षित’ या शब्दाऐवजी ‘उपेक्षित’ असे उच्चारण केले. ही चूक राज्यपालांच्या लक्षात आल्याने त्यांनी तेजप्रताप यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. मुलायमसिंग यादवयांची अनुपस्थितीशपथविधी कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव आणि त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सहभागी झाले नव्हते; परंतु मैनपुरीमधील सपाचे खासदार आणि लालूप्रसाद यांचे जावई तेजप्रतापसिंग मात्र हजर होते.बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासह एकूण २९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यघटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळात अजूनही सात जागा रिक्त आहेत. संजद, राजद आणि काँग्रेस आपल्या नाराज नेत्यांना मंत्रिपद देऊन यांची भरपाई करू शकतात.२४३ सदस्यीय विधानसभेत १५ टक्के म्हणजे मुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्री सामील होऊ शकतात. निवडणुकीतील संख्याबळानुसार राजदला १६, संजदला १४ आणि काँग्रेसला ५ मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे.या मंत्र्यांनी घेतली शपथराजद...तेजस्वी यादव- उपमुख्यमंत्रीतेजप्रताप यादव- आरोग्यअब्दुल बारी सिद्दीकी- अर्थआलोककुमार मेहताचंद्रिका रायरामविचार रायशिवचंद रामअब्दुल गफूरचंद्रशेखरमुनेश्वर चौधरीअनिता देवीविजय प्रकाश

जनता दल (सं.)...विजेंद्र प्रसाद यादवराजीव रंजनसिंग ऊर्फ ललन सिंगश्रवणकुमारजयकुमार सिंगकृष्णनंदन प्रसाद वर्मामहेश्वर हजारीशैलेशकुमारमंजू वर्मासंतोषकुमार निरालाखुर्शीद ऊर्फ फिरोज अहमदमदनसिंगकपिलदेव कामत

काँग्रेस...अशोककुमार चौधरीअवधेशकुमार सिंगअब्दुल जलील मस्तानमदन मोहन झा