शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

By बाळकृष्ण परब | Updated: November 27, 2020 17:58 IST

Nitish Kumar News : महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाहीनितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा निसटता पराभव झाल्यापासून महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. आज बिहार विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले. मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही, अशी मुक्ताफळे तेजस्वी यादव यांनी उधळली.तेजस्वी यादव म्हणाले की, मुलगी जन्माला येईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही. नितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच त्यांना कॉपीराइट उल्लंघनाच्या एका प्रकरणात २५ हजार रुपये दंड भरावा, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे.तेजस्वी यादव यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना संसदीय कार्यमंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले की, हत्येच्या प्रकरणाचा खटला पाटणा हायकोर्टाने आधीच फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टाने या आरोपांवर कठोर टिप्पणी केली आहे. त्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांनी सभागृहाच्या कामकाजामधून हे आरोप फेटाळून लावण्यात यावेत, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.त्यानंतर तेजस्वी यादव यांनी पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नितीश कुमार यांनीही आरोप करण्यात सुरुवात केली. ते म्हणाले की, तेजस्वी यादव तुम्ही चार्जशिटेड आहात. माझ्या मित्राचे पुत्र आहात. त्यांना मी नेते बनवले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. तेजस्वी यादव यांची चौकशी करा. त्यांच्याविरोधात कारवाई होईल. हे खोटे बोलत आहेत. माझ्या भावासमान मित्राचा मुलगा आहे, म्हणून ऐकून घेतो, असा संताप नितीश कुमार यांनी व्यक्त केला.दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला होता. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा हवा या हव्यासापोटी लालूप्रसाद यादव यांनी नऊ मुलींना जन्म दिला, लालूंना मुलींवर विश्वास नव्हता, असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवPoliticsराजकारण