शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नितीश कुमार यांनी दगाबाजी केली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 11:16 IST

आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे

नवी दिल्ली, दि. 27 - नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. दरम्यान नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानतर 24 तासांच्या आत सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  

'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी बोलले आहेत. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत. 

बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजजमान झाले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता राजभवानात त्यांचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांचाही शपथविधी पार पडला. सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा - जदयू समीकरण जुळलं असून 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार आणि सुशील मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारच्या विकास आणि समृद्धीसाठी एकत्र काम करु असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. दरम्यान राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने आरजेडीने आयोजित केलेला मोर्चा रद्द करण्यात आला.